Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळावी! जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी : जिल्हाधिकारी, आयुक्तांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.२९ – गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने व्यापारी अजूनही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे आवक पूर्णपणे थांबलेली असतानाही दुकानाचे मेंटेनन्स, भाडे, लाईटबील, पगाराचा भार मात्र व्यापारी बांधवांनी सहन केला आहे. अनलॉक प्रक्रियेमध्ये सोमवार ते शुक्रवार ५ दिवस दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांच्या जीवात जीव आला खरा, परंतु मार्केट अजूनही थंडावलेलेच
आहे. एकूणच जळगावचे ‘व्यापार विश्व आर्थिक तणावात आहे. त्यासाठी कृपया खालील मुद्दे विचारात घेऊन सोमवार ते रविवार दुकाने सुरु करण्याची परवानगी जाहीर करावी तसेच दुकानांची वेळ वाढवावी, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

अशा आहेत मागण्या


१) मार्केटसाठी पाचच दिवसांचा आठवडा असल्याने महिन्यात सुमारे ८ दिवस दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. परंतु भाडे, मेंटेनन्स, सहकाऱ्यांचे पगार इत्यादी सर्व विषयांची पूर्तता एक महिन्याच्या हिशोबाने करावी लागत असल्याने प्रचंड आर्थिक ओढाताण सुरु आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सुद्धा दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळाल्यास उत्पादन व विक्रीसाठी २५% अधिकचा कालावधी व्यापारी बांधवांना मिळेल व त्याची मदत आर्थिक ताण कमी करण्यासाठी व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच होईल.
२) पितृपक्ष संपल्यावर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडतील. ७ दिवसांचा आठवडा झाल्यास ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळणे व्यापारी बांधव आणि नागरिक सर्वासाठीच सोईचे होईल. कारण ५ दिवसांचा ताण ७ दिवसांमध्ये विभागला जाईल.
३) कोविड संदर्भात काळजी घेणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे, परंतु ज्यापद्धतीने मंदीची लाट आलेली आहे त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक
संकटावर मात करणे हीसुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आणि तार्किकदृष्ट्या योग्य पाऊल आहे. त्यासाठी मार्केट ही अत्यंत महत्वाची जागा आहे.
४) तसेच मार्केटवर अवलंबून असलेले हमाल, हात मजुरी करणारे कामगार, रिक्षाचालक, मालवाहक इत्यादी सर्वांनाच २ दिवस मार्केट बंद राहत असल्याने तडजोड करावी लागत आहे. शनिवार-रविवारला दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यास हातावर पोट असलेल्या माणसांना रोजगार मिळेल.

अन्य शहरांप्रमाणे आपल्या जळगाव शहरातही शनिवार-रविवार दोन दिवस असलेली बंदी उठवून व्यापार सुरु ठेवण्याची परवानगी जाहीर
करावी व जळगावच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन;विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना केली प्रत्येकी दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d