Saturday, January 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशातील नाट्यचळवळीला पुन्हा संजीवनी मिळेल का?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
खान्देशातील नाट्यचळवळीला पुन्हा संजीवनी मिळेल का?

जळगांव(प्रतिनीधी)- आज मराठी रंगभूमी दिवसाच्या निमित्ताने माझ्या सर्व रंगकर्मी कलाकार व व्यवसायीकांना हार्दीक शुभेच्छा! मराठी रंग भूमी ने अनेक दिग्गज कलाकार दिले, व त्याच्यात खान्देश चा खुप मोठा सहभाग आहे, महाराष्ट्रात खर तर एक काळ असा होता की, खान्देश व कोकणात गल्लोगल्ली नाटके होत, खान्देशात तर गावागावात नाट्यमंडळ होती, खुप चांगले अभिनय ही सादर होत, खान्देश मध्ये नाटक, तमाशा ह्या गोष्टींना सुगीचे दिवस होते, कारण सर्वोत्तम कलाकार खान्देश मध्ये होते, महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा मंडळाची पेढी ही अमळनेर होती, कालांतराने लोप पावत नारायणगाव ला गेली. तसेच नाट्य चळवळ होती, पण आम्ही खरच ती जोपासली नाही, त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे स्थलांतर पण आहे, रोजगार नसल्यामुळे तरुण शहराकडे वळले, परंतु कोकणातील तरुणांनी व रसिकांनी ही चळवळ दिवंगत केली, मोजक्या लोकांची मालवणी भाषा सातासमुद्रापार गेली, त्याला कारण म्हणजे त्यांचे त्यांच्या संस्कृतीवर प्रेम भाषेवर प्रेम म्हणून ती जिवंत आहे, आजही कोकणी माणूस पदरमोड खर्चाने नाटकाचे तिकीट काढून नाटक बघायला जातात, त्यांच्या कार्यशाळा आहेत, कलाकारांना नवोदित कलाकारांची जाण आहे.आज आमच्याकडे जळगाव मध्ये एक हजार प्रेक्षक गृहाचे नाट्यगृह आहे, मला वाटत भारतातील सर्वात मोठे नाट्यगृह आहे, अमळनेर येथे भव्यदिव्य आधुनिक नाट्यगृह आहे, धुळे येथे खुप मोठे स्व लोकनेते भाऊसाहेब हिरे नाट्यगृह आहे, नंदुरबारला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आदयावत आहे. पण नाटक नाहीत, कलाकार नाहीत, हे सर्व नाट्यगृह राजकीय पक्षांचे आखाडे व विवाह मंगलकार्ये बनले आहेत, खर तर काळाची गरज आहे नाट्यचळवळ उभी राहण्याची, जे नामांकित कलाकार असतील, दिग्दर्शक असतील किंवा ज्यांना कला जोपासण्याचा छंद असेल त्यांनी पुढाकार घ्यायला हरकत नाही. मागील काही काळात लघुपट व गाण्यांच्या सिडींनी खान्देशात धुमाकूळ घातला होता, खुप चांगले कलाकार तयार होत होते, पोट खाली ठेवून कोणतीच गोष्ट शक्य नाही, म्हणून अनेक चांगले कलाकार उद्यास येवु शकले नाहीत, व जे चांगले गायक होते त्यांची अशी अवस्था आहे की, ते अंत्ययात्रेत गाणी गातात, हे सर्व पुन्हा चालु झाले पाहिजे पुन्हा बी कुमार राजवडकर जन्माला यायला हवे, उत्तम नाच्या, पंडीत नाच्या, जन्माला यायला हवेत, मा विश्राम (आप्पासाहेब) बिरारी, मा इश्र्वर माळी आणि इतर सर्व कलाकार ज्यांनी खुप मोठे योगदान दिले आहे, ते सर्व ह्या चळवळीत चिरतारूण्यात यायला हवे, हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आणि सर्व रंगकर्मी कलाकारांचे पुन्हा हार्दीक अभिनंदन करतो.

सुरेश पाटील प्रवक्ता खान्देश हित संग्राम ९००४९३२६२६

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारातून परिवर्तनने साजरा केला रंगभूमी दिन

Next Post

चाराटंचाई निवारणासाठी जिल्हा वार्षिक विकास विभाग काय करणार?

Next Post
चाराटंचाई निवारणासाठी जिल्हा वार्षिक विकास विभाग काय करणार?

चाराटंचाई निवारणासाठी जिल्हा वार्षिक विकास विभाग काय करणार?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d