Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चांगली संगत नैतिक जीवन जगण्यास करते प्रेरित : हभप सागर महाराज मराठे यांचे मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/12/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read

नेहरूनगर येथे हरी कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी) : माणसांची संगत खूप महत्त्वाची आहे. चांगली संगत तुम्हाला नैतिक जीवन जगण्यास प्रेरित करीत असते. वाईट संगत तुमच्या अधोगतीकडे तुम्हाला नेत असते. व्यक्तीने आयुष्यामध्ये भगवंताची साधना केली तर नक्कीच आयुष्यात प्रगती होते, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांनी केले.

नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् भागवत संगीतमय भागवत कथा आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कथेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी अनुक्रमे बीड येथील हभप सोनालीताई करपे महाराज आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांचे कीर्तन झाले. कीर्तनामध्ये त्यांनी विविध संतांच्या अभंगांचे आणि विचारांचे दाखले देऊन भक्तीगीते सादर केली.

हभप सोनालीताई करपे म्हणाल्या की, संतांच्या विविध अभंगांमधून देवाची भक्ती ही स्फुरत असते. त्यामुळे अभंग गायनामध्ये एक विशिष्ट मानसिक शांतता लाभत असते. द्रौपदीची कृष्णाप्रति असलेली बंधूभक्ती खूप महत्त्वाचे आहे. भगवान परमात्मासाठी पदराची चिंधी करून कृष्णाच्या जखमी करंगळीला बांधणे ही गोष्ट तिला प्रेमाची भेट देऊन गेली. आजच्या आधुनिक काळामध्ये संतांची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘आवडे देवांना तो एकची प्रकार’ ह्या भक्तिगीतातून त्यांनी अभंगाविषयीची महती सादर केली.

हभप सागर महाराज मराठे यांनी कीर्तनातून संतांनी अनिष्ट प्रथा परंपरां विषयी केलेले प्रबोधन विविध अभंगातून सांगितले. देशात राजे खूप झालेत. मात्र ज्यांचे नाव अग्रक्रमाने, अभिमानाने घ्यावे असे एकच छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांचे स्थान आजही अढळ आहे. देशभरात त्यांच्यामुळे स्वराज्य निर्माण झाले. पुण्य करत राहिले तर एक दिवस भगवंतच साक्षात तुम्हाला दर्शन देईल. प्रेम करा पण भगवंतावर आणि वैरदेखील भगवंतासोबतच करा. त्यामुळे तुम्ही त्याचे स्मरण करीत राहाल.

आयुष्यात बदल होणे आणि काळानुसार बदलत जाणे हा संसार धर्म आहे. भक्ती करीत राहा, परमार्थ नक्की मिळेल असेही विविध अभंगांच्या दाखल्यातून व कीर्तनातून हभप सागर महाराज यांनी सांगितले. बुधवारी १५ डिसेंबर रोजी नाशिक येथील हभप पांडुरंग महाराज गिरी हे कीर्तन करणार आहेत. भाविकांनी नेहरूनगर येथील गुरुदत्त मंदिर येथे उपस्थिती द्यावी, असे आवाहन शिवराजे फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Next Post

बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात- स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व’: डॉ. दिलीप पांढरपट्टे

Next Post
बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात- स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व’: डॉ. दिलीप पांढरपट्टे

बहिणाबाईंच्या काव्याने भावांजली महोत्सवाची सुरवात- स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व': डॉ. दिलीप पांढरपट्टे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo