Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हवालदिल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हवालदिल

जळगाव(धर्मेश पालवे)- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, भुसावळ आणि पारोळा व पाचोरा या तालुक्यांना मागील आठवड्यात अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. वादळ पाऊस वाऱ्यासह या तालुक्यातील गावे पुराच्या पाण्यामुळे भितीखाली वावरत आहेत.या गावांमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून लहान-मोठ्या जनावराचे मृत्यु झाला आहे.

दुकानांमध्ये पाणी घुसून मालाचे नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे शंभरच्या वर घरांमध्ये पाणी शिरले होते. ही नैसर्गिक आपत्ती आहे, याचा कांगावा करत आपली जबाबदारी झटकून तोंडसुख घेणारे आपत्ती व्यवस्थापन विभाग व राजकीय मंडळी मागे हटताना आपण सर्वांनी पाहिले. काल दिवसभर जामनेर तालुक्यात ही चाळीसगाव मध्ये पाऊस झाला तसा जोरदार पाऊस झाला. जामनेर मधील जणजीवन विस्कळीत झालं. अनेक गावांचा संपर्क तुटून भीती सदृश्य वातावरणाला जामनेर व शेजारील गावांना सामोरे जावे लागले आहे. आणि आज ही तेथे भीतीखाली लोकं वावरत आहेत. जनावरे, मानवी कुटंब यांना जिवित हानी झाली आहे.या शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे त्या परिवाराचे पुर्नवसन होने, आरोग्य अन्न व प्राथमिक गरजा पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, पुरामुळे जामनेर व चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

भडगावात बहुसंख्य घरांची पडझड झाली आहे. जामनेर तालुक्यातही घरांचे नुकसान झाले आहे. तसेच जळगाव जिल्हयामधील तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. असे असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पाहिजे तसा सक्रिय होताना दिसत नाही. अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग,व आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी या संकट काळी मदतिला धावून आल्याच दिसत नाही. जर आपत्ती व्यवस्थापन विभागाने पर्जन्य अनुमानानुसार पूरस्थिती कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष परिस्थिती पाहून संबंधित तालुके व गावांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी आपली कंबर कसली असती तर आज बोरी नदीत पूर आल्याने वाहतूक व संपर्क तुटल्याच्या कारणे एका 13वर्षीय चिमुकलीचा जीव गेला नसता. ओझर येथील घराचे छत्र उडाले नसते.आणि जनावरांचे जीव गेले नसते.

महाराष्ट्र् राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तरतुदी नुसार आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षितेचि जबाबदारी ही संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापन विभागाची आहे. त्या अनुषंगाने सदर घटनांना शह देण्यासाठी आप आपल्या परीने विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय प्रतीनिधी यांची जबाबदारी पाडली पाहिजे. असा सूर सदरील घटनास्थळी झालेल्या नुकसानी कडे पाहता म्हणता येईल.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मण्याड धरणातुन ६० ते ७० हजार क्युसेक विसर्ग सुरू;नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे

Next Post

अजय पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post
अजय पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अजय पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d