Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निवडणूक साक्षरता मंच प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करावा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
निवडणूक साक्षरता मंच प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करावा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

अमरावती(प्रतिनिधी)- मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिली.

श्री. देशपांडे यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्याशी निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

नवतरुणांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्यात यावा. तसेच विद्यापीठ आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा मतदार यादीतील नोंदणीसाठी सहभाग वाढावा या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा, असेही श्री. देशपांडे यावेळी म्हणाले.

डॉ. मालखेडे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून अमरावती विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागासह विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविल्या जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.श्री. देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये बडनेरा येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पथनाट्य सादर केले.

Team Satymev Jayate

Previous Post

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर भर

Next Post

वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा -पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

Next Post
वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा -पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा -पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo