Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवणे हा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमींच्या संघर्षाचा विजय – आमदार मंगेश चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवणे हा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमींच्या संघर्षाचा विजय – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव – आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने चाळीसगांव येथे दि.११ ऑगस्ट २०२१ रोजी बैलगाडा शर्यंत बंदी विरोधात निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता, उत्तर महाराष्ट्रात प्रथमच
शेकडो शर्यतीचे सर्जा – राजा बैलांच्या सोबत निघालेल्या या मोर्चात हजारो बैलगाडा चालक मालक, प्रेमी उपस्थित होते. त्यावेळी
मुख्यमंत्री यांनी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनांसोबत बैठक घ्यावी व हा विषय गांभीर्याने घेत सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेत भूमिका मांडावी अन्यथा राज्यातील सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी मंत्रालयाच्या आणि मंत्र्यांच्या दावणीला बैल बांधून आंदोलन करतील असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला होता.


नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्तींचे पालन करत बैलगाडी शर्यतींना परवानगी दिल्याने बैलगाडा शर्यत प्रेमींच्या आंदोलनाला मोठं यश आले असून याचा परिणाम आगामी काळात ग्रामीण भागातील अर्थकारणावर होणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने सर्व बैलगाडा चालक, मालक, शर्यत प्रेमी यांचे अभिनंदन केले असून हा खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यत प्रेमींनी केलेल्या संघर्षाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली.


‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे याचा एक भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.

तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती बाबत कायदा केलेला आहे याच कायद्याच्या धर्तीवर बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये कायदा केला नंतर कायद्याला काहींनी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर राज्य शासनाने सदर केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र मागील तीन वर्षात कोणत्याही प्रकारची सुनावणी न झाल्याने महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी व शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी होती. तामिळनाडू व कर्नाटक मध्ये याच धर्तीवर कायदा केलेला असून सुद्धा तेथील शर्यतीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली नव्हती, त्यामुळे पूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

Next Post

ऑटो रिक्षाच्या भाडेदरात 20 डिसेंबरपासून वाढ

Next Post
ऑटो रिक्षाच्या भाडेदरात 20 डिसेंबरपासून वाढ

ऑटो रिक्षाच्या भाडेदरात 20 डिसेंबरपासून वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d