Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

जळगाव – (प्रतिनिधी ) – हरी विठ्ठल नगर येथील मंगल मैत्री ग्रुपच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व मिरवणूक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हरी विठ्ठल नगर येथील बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
या कार्यक्रमास मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते कैलास हटकर व भारत सोनवणे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी माता रमाई आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, त्यांचे संघर्षमय जीवन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील त्यांचे मोलाचे योगदान यावर प्रकाश टाकला. रमाई यांच्या विचारांची आजच्या पिढीला असलेली आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

उद्घाटक डॉ. अमृता सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिलांनी आत्मसन्मानाने जगावे, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य घडवावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, हा माता रमाई आंबेडकर यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. सद्यस्थितीत महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक न्याय व समतेसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंगल मैत्री ग्रुपच्या महिलांनी केल्याबद्दल त्यांनी सर्व महिलांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या झनके यांनी केले.
यानंतर डॉ अमृता सोनवणे यांच्या हस्ते मिरवणुकीस झेंडा दाखवून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पुष्पांनी सुशोभित केलेल्या घोडागाडीत विराजमान असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यासह उद्घाटकांच्या हस्ते केक कापून उपस्थित महिलांनी एकमेकींना केक भरवून आनंद व्यक्त केला.

मिरवणुकीदरम्यान उपस्थित महिला, पुरुष व आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे डिजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी प्रमुख अतिथींनीही उपस्थितांच्या विनंतीनुसार नृत्यात सहभाग नोंदवला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
ही मिरवणूक हरी विठ्ठल नगर बाजारपेठ येथून राजीव गांधी नगर, वाघ नगर स्टॉप मार्गे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून पुढे चित्रा चौक, टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा इंगळे, उषा इंगळे, प्रमिला इंगळे, उषा तायडे, विद्या झनके, उज्वला सपकाळे, शैला पारधे, शोभा पातुडे, छाया इंगळे, आकाश तायडे, आकाश झिने यांच्यासह मंगल मैत्री ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास माँ शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा अंभोरे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बिऱ्हाडे यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

Next Post

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post
कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo