Friday, November 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले ३१ झाडांचे वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2023
in जळगाव
माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले ३१ झाडांचे वृक्षारोपण

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथील श्री रामकृष्ण हरी मंदिर येथे माणुसकी समूहातर्फे गीते डेंटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल शेंदुर्णी संचालक डॉ. महेंद्र गीते यांच्या वाढदिवसानिमित्ताने ३१ झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की आज वाढदिवस म्हटला की विनाकारण खर्च केला जातो, तो केक, गाजावाजा या गोष्टीला फाटा देत माणुसकी रुग्णसेवा समूह वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सदस्यांचा वाढदिवस साजरा करत असतात यामधे डॉ.महेंद्र गीते यांच्या वाढदिवसा निमित्ताने लोहारा या आपल्या गावातील श्रीरामकृष्ण हरी मंदिरामध्ये झाडांचे वृक्षारोपण करून वेगळा आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला. या वृक्षांमध्ये बेल ,आंबा ,मोगरा ,चाफा, पिंपळ,अशोका, सप्तपर्णी, अशा प्रकारचे वृक्ष लावण्यात आले ,दरवर्षी वाढदिवसाला वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माणुसकी समूहाचे निस्वार्थी कार्य पाहून मी प्रेरित झाल्याचे डॉक्टर महेंद्र गीते यांनी यावेळी सांगितले.माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज हे समजावून सांगितले. यावेळी माणुसकी ग्रुप सदस्य डॉ.महेंद्र गीते, (गीते डेंटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक),डॉ ज्ञानेश्वर चव्हाण (दंत रोग तज्ञ ,नायर हॉस्पिटल मुंबई )रवींद्र कलाल, श्रीराम कलाल,गजानन क्षीरसागर,कडूबा चौधरी,स्वरा क्षीरसागर उपस्थित होते.

महाराष्ट्रात १९७२ नंतरचा सर्वात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे.कोरोनामुळे आज आपल्याला कुठे झाडांचे महत्त्व कळायला लागले आहे एका आँक्सिजन सिलेंडर चे हजारो रुपये देवुन सुध्दा मिळाले नाही. पन वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित नॅट टेस्टेड रक्त देणे गरजेचे- आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा यांचे मनोगत

Next Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दणदणीत विजयी

Next Post
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दणदणीत विजयी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दणदणीत विजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार;केळी पीक विमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार;केळी पीक विमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा

४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार हिला सुवर्णपदक

४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार हिला सुवर्णपदक

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d