Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६६ गुन्हे दाखल;१९८ लोकांना अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

मुंबई दि. १० : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

Maha Info Corona Website

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १६ गुन्हे अदखलपात्र (N.C) आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे

त्यामध्ये बीड ३५, पुणे ग्रामीण २९, जळगाव २६, मुंबई २१, कोल्हापूर १६, नाशिक ग्रामीण १५, सांगली १४, ठाणे शहर १३, बुलढाणा १२, जालना १२, नाशिक शहर ११, सातारा १०, पालघर १०, लातूर १०, नांदेड १०, परभणी ८, नवी मुंबई ८, सिंधुदुर्ग ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७, नागपूर शहर ७, हिंगोली ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४, भंडारा ४, पिंपरी- चिंचवड ४, अमरावती ग्रामीण ४, चंद्रपूर ४, रायगड २, धुळे २, वाशिम २, यवतमाळ १,औरंगाबाद १ (एन.सी), यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १५५ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  Titktok विडिओ शेअर प्रकरणी १६ व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत १९८ आरोपींना अटक केली आहे. आक्षेपार्ह अशा १०२  पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४ झाली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने, फिर्यादीबद्दल चुकीची माहिती असलेली व धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती, त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

ऑनलाईन व्यवहारात सावध राहा

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्व ज्येष्ठ व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, आपण ऑनलाईन वस्तू खरेदी करताना किंवा काही आर्थिक व्यवहार करताना सावध व सजग राहा. कोणत्याही अपरिचित वेबसाईटवर आपली सर्व माहिती विशेषतः बँक खात्याचे क्रमांक, डेबिट /क्रेडिट कार्ड पिन नंबर इत्यादी देऊ नका. जर तुम्हाला त्या वेबसाईटवरील मजकूर संशयास्पद  वाटत असेल तर आधी कोणत्याही जाणकार व्यक्तीकडून माहिती करून घ्या.

तसेच सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट किंवा बातमी खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘गो.. गो.. गो.. कोरोना’.. जिल्हा कोरोनामुक्त..!

Next Post

विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d