Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकहो, आत्महत्या करू नका, आमच्याशी बोला(People, don’t commit suicide, talk to us)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
लोकहो, आत्महत्या करू नका, आमच्याशी बोला(People, don’t commit suicide, talk to us)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये तरुण वर्गाचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्याचा विचार कोणाला असेल तर त्याच्याशी संवाद साधावा, मार्गदर्शनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मानसोपचार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप महाजन यांनी सांगितले की, आत्महत्या या घटनेमागे निराशा, अपयश या नकारात्मक भावना आणि मृत्यूचे भय असल्यामुळे आजही आत्महत्या हा विषय मोकळेपणाने चर्चिला जात नाही. परंतु याविषयी योग्य संवाद साधला गेला तर आत्महत्येच्या कल्पनेमागे (सुसाइड आयडिएशन) जी कारणे आहेत त्यांची ओळख सर्वाना होईल. अनेक जण आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतील. चिंताजनक बाब ही की, हताश आणि निराश झाल्यानंतर फक्त प्रौढच आत्महत्येचा मार्ग निवडत नाहीत तर अधिकाधिक मुलं आणि तरुणसुद्धा हा मार्ग निवडतात.

त्यामागची कारणं हिंसा, परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, लैंगिक शोषण, सायबर शोषण, घरगुती समस्या, खऱ्या किंवा आभासी अपयशामुळे आलेली निराशा ही आहेत. आत्महत्या थांबवणे हे एक सार्वत्रिक आव्हान आहे. आत्महत्या ही वैयक्तिक शोकांतिका तर आहेच, कारण हे कृत्य त्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतं; पण तिच्या स्नेही, कुटुंबीय यांच्यावर न पुसणारा कायमसाठीचा आघात करून जातं, अशीही माहिती डॉ. महाजन यांनी दिली.

आत्महत्यापासून परावृत्त होण्यासाठी किंवा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभाग येथे संपर्क साधावा. डॉक्टरांशी संवाद साधावा, कुठल्याही समस्या कायमस्वरूपी नसतात, नैराश्यातून बाहेर पडावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यमाई केले आहे.

नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये दिसणारे बदल

एकटं-एकटं राहणं, लोकांना सामोरं जाणं टाळणं, आधी आवडणाऱ्या गोष्टींपासून पूर्ण विरक्ती, स्वत:च्या दिसण्याबद्दल पूर्णपणे निष्काळजीपणा असणे, अधिक प्रमाणात मद्यपान किंवा अमली पदार्थाचे सेवन करणे, धोकादायक आणि निष्काळजीपणाने वागणे, नैराश्यातून वाहने अत्यंत वेगाने चालवणे, उगाच धोका पत्करणे, स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल पूर्णपणे बेफिकिरी दाखवणे, आयुष्यातून निरोपाची भाषा वापरणे, स्वत:च्या खासगी वस्तू देऊन टाकणे, मृत्युपत्र बनवणे, मनातले कागदावर उतरवणे, सुसाइड नोट लिहायला घेणे आदी बदल दिसायला लागत असतात.

आत्महत्या थांबवू शकतो का?
एखादी व्यक्ती आत्महत्येबद्दल बोलत असेल किंवा वर सांगितलेल्या गोष्टी करत असेल तर तिचं म्हणणं अत्यंत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीला समुपदेशकाकडे जाण्याबद्दल हळुवारपणे सुचवल्या जाऊ शकतं. त्यांच्या कुटुंबीयांना ‘त्या व्यक्तीला अधिक संवेदनशील वागणूक देण्याची गरज आहे’ असं सूचित केलं जाऊ शकतं. एखादी व्यक्ती भावनाविवश होऊन आत्महत्या करण्याबद्दल उघडपणे बोलत असेल तर अशा व्यक्तीला अजिबात एकटं सोडता कामा नये. त्याचे इतर कुटुंबीय आणि मित्रवर्गाला विश्वासात घेतलं पाहिजे.

टिम-सत्यमेव जयते

Tags: don't commit suicidePeople
Previous Post

डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियान(Free e-Shram Card Registration Campaign under the guidance of Dr. Kundan Phagde)

Next Post

कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

Next Post
कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo