Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आकुर्डी येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष संजय पाटील, आमदार ऋतूराज पाटील, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.प्रभात रंजन, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, संकुल संचालक डॉ.नीरज व्यवहारे, ज्ञानशांती शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, समाजातील सर्व घटकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांचा हाच वारसा पुढे नेण्याचे काम त्यांच्या नंतरच्या दोन्ही पिढ्या सक्षमपणे करत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक तसेच शैक्षणिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्यामध्ये डॉ. डी. वाय.पाटील यांच्या नावाने असलेल्या या शैक्षणिक संकुलात नव्याने सुरू झालेली शाळा संस्कार शाळा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जपळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि तीन लाखावर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडणे ही गौरवास्पद बाब असल्याचा उल्लेखही श्री.पवार यांनी केला.

निगडी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे वैभवात भर पडली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच छंद जोपासावा. जीवनात मोठे होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असावा. त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षित करावे. शैक्षणिक संस्थांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील उत्तम सुविधांचा लाभ समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांना संस्थेत प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय पाटील शैक्षणिक संस्थेत एक लाख विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. यामध्ये शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या संस्थेचा कायम प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते यावेळी ऑक्सीजन प्लांटचेही उद्घाटन झाले. तसेच श्री.पवार यांनी शैक्षणिक संकुलाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अपर मुख्य सचिवांनी घेतला ‘प्रत्येक शेताला पाणी’ योजनेचा आढावा

Next Post

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

Next Post
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d