Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सोयाबीनाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृ‍षि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सोयाबीनाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृ‍षि विभागाचे आवाहन

जळगाव, दि. 22 (जिमाका) – यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे टंचाई भासण्याची शक्यता आहे. याकरीता शेतकऱ्यांनी स्वत:कडील राखुन ठेवलेले सोयाबीन हे बियाणे म्हणुन वापर करणेबाबत खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणुन शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. ग्रामबिजोत्पादन पीक प्रात्यक्षिके, शेतकरी समूह इ. कार्यक्रमातंर्गत उत्पादित बियाण्यांचा वापर शक्य आहे. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. सोयाबीन बियाणाची बाह्यआवरण नाजुक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी.


सोयाबीन बियाणे हवेतील आर्दता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणूकीचे ठिकाण थंड ओलविरहीत व हवेशीर असले पाहीजे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता तपासुन नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता 65 टक्के पेक्षा कमी असल्यास त्याचे त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणी करीता वापरावे. प्रति हेक्टरी सोयाबिन बियाणे दर 75 किलो वरुन 50 त 55 किलोवर आणणेसाठी सोयाबिन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॅटरचा वापर करावा.
याबाबत शेतकरी बांधवाना काही समस्या असल्यास कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

Next Post

“बेस” जळगाव तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

"बेस" जळगाव तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d