Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ. र.ना. देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न; भडगावच्या जकातदार स्मृतिकरंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सौ. र.ना. देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न; भडगावच्या जकातदार स्मृतिकरंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद

भडगाव(प्रतिनिधी)- सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय आबासाहेब मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्वर्गीय वत्सलाबाई मधुकर जकातदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. आभासी (ऑनलाईन) पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नाशिक येथील एच.पी.टी. आर्टस् आणि आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुती अशोक बोरस्ते हिने प्रथम क्रमांक पटकावला.

तिला ५००० रूपये रोख , स्मृतिकरंडक व प्रमाणपत्र देण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगली (भारती विद्यापीठ, पुणे)चा विद्यार्थी शिवम संजय मालकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याला ३०००रूपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा विद्यार्थी जयेश संजय सोनार व बी.के. बिरला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कल्याण येथील विद्यार्थी यश रवींद्र पाटील यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. २०००रूपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ५०० रूपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजी येथील विद्यार्थी अक्षय मारुती शेळके व सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थिनी कु. समीक्षा ज्ञानेश्वर आव्हाळे यांनी प्राप्त केले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय ओंकार वाघ होते. उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश जकातदार (सेवानिवृत्त गणित विभागप्रमुख, सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट, मुंबई) उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी. एस. अहिरराव यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले.

पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक व स्पर्धेचे प्रायोजक विनय मधुकर जकातदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक खलील देशमुख उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनंदा जकातदार (नागपूर), प्रा. डॉ. प्रशांत देशमुख (रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी) व प्रा. डॉ. दीपक मराठे (सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव) यांनी काम पाहिले. यावेळी रेखा जकातदार, उपप्राचार्य प्रा.एस.आर.पाटील यांची उपस्थिती होती. परीक्षकांच्या वतीने सुनंदा जकातदार यांनी स्पर्धेसंबंधीचे आपले मत नोंदवले.

सूत्रसंचालन डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर डॉ. सी. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कोविड-१९ चा शिक्षणावरील परिणाम’, ‘ऑनलाइन शिक्षणपद्धती शिक्षणव्यवस्थेत बदल घडवू शकते काय ?’, ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि सद्यस्थिती’ आणि ‘नवीन कृषी कायदा आणि आजचा शेतकरी’ हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. बी.एस. भालेराव यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भातखंडे गावात नदीवर स्वखर्चातुन उभा राहिला पुल

Next Post

युवकांना रोजगारक्षम करणे काळाची गरज;डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन

Next Post
युवकांना रोजगारक्षम करणे काळाची गरज;डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन

युवकांना रोजगारक्षम करणे काळाची गरज;डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d