Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अज्ञात समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाच्या गंज्जीला आग लावून देण्याचे प्रकार -शेतकरी चिंतेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अज्ञात समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाच्या गंज्जीला आग लावून देण्याचे प्रकार -शेतकरी चिंतेत

फैजपुर(किरण पाटील)- अज्ञात भामट्यानी विरोदे -हंबर्डी येथे शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाच्या गंज्जीला आग लावून पेटवून देण्याचे प्रकार  घडल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अज्ञात भामट्याने गव्हाच्या गंज्जीला आग लावून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. शेतकरी अर्धपोटी उपाशी राहून रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करीत असतो. रात्रीही शेतात जाऊन पिकांना पाणी देत असतो. ऐन तोंडाची घास आल्यावर मजुरांकडून गव्हाची कापणी करून घेतात. एकत्रित जमा करून दुसऱ्या दिवशी मळणी करण्याच्या उद्देशाने गव्हाची गंजी मारून घेत असतो. शेतकरी शेतातून घरी आल्यावर रात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात भामटे, समाज कंटक त्यास आग लावून देण्याचे प्रकार करतात. अशी घटना विरोदे,हंबर्डी येथे नुकतेच घडली आहे. निसर्ग साथ देत नाही, शेतकऱ्याची विकट परिस्थितीत अज्ञात भामटे शेतकऱ्याच्या शेतातील वारंवार नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी हंबर्डी येथील शेतकरी प्रमोद सुधाकर पाटील यांच्या सव्वा बिघ्यांमधील गव्हाची गंज्जी पेटून दिली होती. त्यात शेतकऱ्याचे २६ ते २८ हजाराचे नुकसानास अज्ञात बामटा कारणीभूत ठरला आहे. त्याचप्रमाणे विरोदे येथे दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान शेतकरी भास्कर कौतिक चौधरी यांचे शेत खेडने गहू पेरण्यासाठी शेतकरी प्रमोद दपाळू चौधरी यांनी अडीच बिघ्यांमध्ये गहू पेरला होता. अज्ञात भामट्याने आग लावून ३८ ते ४० हजारांचे नुकसान केले आहे. या शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नुकसान केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. मागील वर्षी आमोदा, बामणोद शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील कडब्यांच्या बुडाला आग लावून पेटवून दिले होते. आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची बिकट स्थिती अश्या घटनांमुळे निर्माण होत आहे. प्रशासनाने यात लक्ष्य घालून बळीराज्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी भावना जनसामान्यत निर्माण झाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सुस्त पुरवठाविभागाच्या आर्शिवादाने; स्वस्त धान्य दुकानदार ३८/२ चा मनमानी कारभार, तहसीलदार यांचेकडे तक्रार केल्यावर उघडले दुकान

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; कासोदा व परिसर दिव्यांच्या रोषणाई ने गजबजला

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; कासोदा व परिसर दिव्यांच्या रोषणाई ने गजबजला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; कासोदा व परिसर दिव्यांच्या रोषणाई ने गजबजला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d