Thursday, January 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

…आणि आता विद्यार्थ्यांना फळ्याचा लागेल का लळा? -योगेश पी.पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in लेख
Reading Time: 1 min read
…आणि आता विद्यार्थ्यांना फळ्याचा लागेल का लळा? -योगेश पी.पाटील

सध्या महाराष्ट्र मध्ये ९०% शाळा सुरू झाले आहेत. ही एक पालक म्हणून आनंदाची बातमी आहे. मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या पण शिक्षण थांबावे नाही म्हणून शासनाने शाळा डिजिटल झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक मजेशीर शाळा सुरू झाली. जेथे शाळेत मोबाईल आणू नये, तू लहान आहे तू मोबाइल वापरू नये अश्या सूचना देणार वर्ग स्वतः मुलांना महागडे मोबाइल देताना दिसून आले ही एक बाब देखील आहे.

तरी देखील काही भागात केव्हा काही घरात मोबाइल घेणे कितपत परवडले तसेच आदिवासी भागात मोबईल घेतला तरी त्यांना रेंज कुठे? हा एक संशोधनाचा एक भाग आहे. या सर्व बाबी कडे आपण दुर्लक्ष करूया. आता शाळा पुन्हा सुरू होत आहे, मुलांनी पुन्हा मोबाइल सोडून खडू पेन घेतला आहे. शिक्षक पुन्हा घर सोडून शाळेत येतांना दिसतात. पुन्हा शाळेची घंटा एकू येत आहे. जो गणवेश दीड वर्षा पासून कपाटात होता त्याला पुन्हा इस्तरी झाली. लॉकडाउन मुळे घरी नवीन नवीन मेजवानी खाल्ल्याने गणवेश तंग होऊ शकतो तर एकीकडे तोच गणवेश घराचे उत्पन्न थांबले होते म्हणून गणवेशला आता करदोडा लावतांना दिसून येत आहे.

आपण याकडे पण दुर्लक्ष केले तरी, आपण शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी याकडे गांभीर्याने शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जेव्हा विद्यार्थीचा शिक्षणात 1 वर्ष गॅप पडत असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण घेण्यासाठी गॅप प्रमाणपत्र द्यावे लागते. मग आता शिक्षक वर्ग मागील दीड वर्षा पासून घरी आहे, त्यांना कोणते प्रमाणपत्र केव्हा कोणती चाचणी करावी लागेल हा एक संशोधनाचा विषय आहे. तसेच जे विद्यार्थी मागील दीड वर्षा पासून मोबाईल समोर बसून क्लास करत होते त्याची, मानसिक, बौद्धिक क्षमता कितपत असेल, विद्यार्थी परत फळ्या कडे वळतील तर ते कसे वळतील याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

शिक्षण येणाऱ्या काळामध्ये हे पुस्तकी नसून एक मनोरंजनात्मक असावे, खेळीमेळीचे असावे हे माझे वैयक्तीक मत आहे. तसेच शिक्षक वर्ग सोबत देखील रिफ्रेशिंग ट्रैनिंग घेणे गरजेचे आहे. तसेच शिक्षण मंडळानी सुद्धा शिक्षण धोरणात बदल करण्याची गरज भासत आहे. सध्याच्या डिजिटल युगासोबत चालतान डिजिटल ची व्यसने लागली नाही पाहिजे तसेच प्रत्येक शाळेत एक विद्यार्थी समुपदेशक असणे आवश्यक आहे. अदिवासी भागात अनेक विद्यार्थी सोबत शिक्षक वर्गाचा संवाद झाला नसेल त्याबाबत सुद्धा योजना करणे गरचेचे आहे. फक्त नवीन पुस्तक, नवीन गणवेश, डिजिटल शाळा करून शिक्षण डिजिटल होणार नसून विद्यार्थी विकास हा हेतु ठेऊन शिक्षण व्यवस्था व त्याबाबत धोरण करणे गरजेचे आहे. आता स्क्रीन ऐवजी परत फळ्याचा लळा लागेल आणि विद्यार्थी पुन्हा शिक्षण प्रवाहात येतील अशी एक आशा…

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहर वासीयांच्या हितासाठी व व्यापारी वर्गाला पोषक वातावरणात आपले व्यवसाय करता यावेत यासाठी कटिबद्ध -आ. मंगेश चव्हाण

Next Post

खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे -विनोद ढगे

Next Post
खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे -विनोद ढगे

खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे -विनोद ढगे

Comments 3

  1. Avinash says:
    4 years ago

    खूप छान, वास्तवातील आणि सत्य परिस्थिती ची मांडणी केली आहे.

    Loading...
  2. BHAUSAHEB RAMESH SHELKE says:
    4 years ago

    आपण वस्तु स्तुति ची मांडणी केली आहे ती पण अगदी मार्मिक पने याकडे पालक, शिक्षक व शासन यांनी लक्ष दिले पाहिजे

    Loading...
  3. MRUNALI SURESH PIMPALKAR says:
    4 years ago

    Ekdam realistic condition mandali ahe.

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d