Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कळंब शहरामध्ये ७ दिवस राहील जनता कर्फ्यु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read


कळंब, प्रतिनिधी
कळंब शहरामध्ये कोरोनाचा प्रसार बऱ्याच प्रमाणात झाला असून आणखी प्रसार होऊ नये या उद्देशाने कळंब मध्ये ७ दिवसाचा ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय कळंब प्रशासनाने घेतला आहे. कळंब शहरामध्ये या सात दिवसात मेडिकल, दूध, बँक आणि पाणी वगळता सर्व आस्थापना बंद राहतील शिवाय किराणा आणि पेट्रोल सुद्धा बंद राहील. वैद्यकीय सेवा २४ तास सुरू राहतील तसेच पाणी आणि दूध सेवा सकाळी दहा पर्यंत सुरू राहील. कोरोना ग्रामीण भागातही पसरला असून गावांनी ही खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोरोनाविरोधातील युद्ध समृद्ध महाराष्ट्र जिंकेल, मात्र हे युद्ध जिंकण्यासाठी जागरुक, सुजाण व दक्ष असलेल्या प्रत्येकाने योध्द्याची भूमिका बजावली पाहिजे, आम्ही गणवेशातील पोलीस असलोव तरी सर्वसामान्य नागरीक हे सुध्दा साध्या गणवेशातील पोलीसच आहे. अशा भूमीकेतून जनतेच्या खांद्याला खांदा लावून पोलीस विभाग कार्यरत राहील, असे मत पोलिस उपनिरीक्षक चैनसिंग गुशिंगे यांनी व्यक्त केले. कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व शहरातील काही व्यापारी बैठक पार पडली. कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी जनता कर्फ्यु करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भूमिका बैठकीत मांडली. मात्र इतरांच्या एकमताने या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आनंदाची बातमी मण्याड धरण १००% भरण्याच्या वाटेवर

Next Post

माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

Next Post
माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d