Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन गेला घरी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन गेला घरी  डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 15 – कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर फैलावत असताना जळगाव शहरातील मेहरुण येथील व्यक्ती जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण म्हणून आढळून आला होता. तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून या रुग्णांवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु होते.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे 14 दिवसानंतर व 15 दिवसानंतर दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल 17 दिवसानंतर या रुग्णाला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरा झाल्याने रुग्णांचा चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहर्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे या सर्वानी टाळ्या वाजवून संबंधित पॉझिटीव्ही बरे झाल्याचा आनंद व्यक्त केलस. यानंतर डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णाला घरी सोडण्यात आले.

17 दिवसात रुग्ण बरा

मुंबई येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात हा रुग्ण आला होता. यानंतर घरी परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश्य लक्षणे सुरु झाल्यानंतर संबंधित रुग्ण 27 मार्च रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाला होता. त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. 28 मार्च रोजी त्याचा नमुना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झाला. हा व्यक्ती जिल्ह्यातील पहिलाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. या कालावधीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तयेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर महाविद्यालयात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा तसेच 15 दिवसानंतर असे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 13 एप्रिल रोजी रोजी 14 दिवसानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा तर 14 एप्रिल रोजी 15 दिवसानंतर तपासणी निगेटीव्ह असल्याचा अहवाला प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तो कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका व कर्मचारी ठरले हिरो

कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन शिप्टमध्ये डॉक्टर, पारिचारिक असा एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करणारे हे सर्व खरे हिरो ठरले. या कालावधीत जिल्हा सामान्य रुगणालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांचेही सहकार्य लाभले.


डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी हे देवदूत ठरल्यानेच पुर्नजन्म झाला

कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतेल, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार झाले, अगदी कुटुंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी 17 दिवसात बरा झालो. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी हे सर्व माझ्यासाठी देवदूत ठरले. त्यांच्यामुळेच मला पुर्नजन्म मिळाला असून मी खूप आनंदी आहे. माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित रुग्णाने महाविद्यालयाच्या कोरोना संसर्ग वॉर्डातून घरी जाताना व्यक्त केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखणे व लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत विविध आदेश

Next Post

नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांच्यासह कुटुंबीयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घरातच जयंती साजरी

Next Post
नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांच्यासह कुटुंबीयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घरातच जयंती साजरी

नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांच्यासह कुटुंबीयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घरातच जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d