Saturday, January 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जल जीवन मिशन समितीच्या बैठकीत मंजूरी


जळगाव, (जिमाका) दि. 13 – भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश करुन या योजनांच्या खर्चासाठी लागणाऱ्या 58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.
पालकमंत्रीस्तरीय जल जीवन मिशन समितीची बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम, डॉ हर्षल माने यांचेसह जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, भविष्यात टंचाई भासणाऱ्या गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी असून या योजना सन 2024 पर्यंत पूर्ण करावयाच्या असल्याने अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच मंजूर गावांच्या योजनांचे पाण्याचे स्त्रोत काळजीपूर्वक तपासून घ्यावेत. योजनांचे अंदाजपत्रक विहित कालावधीत तयार करण्यात यावेत. अंदाजपत्रकात कोणतीही बाब सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत दिल्यात.


जिल्ह्यातील कोणत्याही गावास पाण्याची टंचाई भासू नये याकरीता यापूर्वीच जिल्ह्यातील 838 गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आला असून त्याकरीता 947 कोटी 73 लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आता नव्याने 265 गावांचा समावेश केल्याने जिल्ह्यातील 1 हजार 103 गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत होणार असून याकरीता 1 हजार 5 कोटी 89 लाख रुपयांचा सुधारित आराखडा होणार असल्याने आजच्या बैठकीत या आराखड्यासही मंजूरी देण्यात आली.


नव्याने समावेश केलेल्या 265 गावांची तालुकानिहाय संख्या
मुक्ताईनगर-17, अमळनेर-28, भडगाव-5, भुसावळ-11, बोदवड-17, चाळीसगाव-14, चोपडा- 33, धरणगाव- 21, एरंडोल-10, जळगाव- 8, जामनेर-24, पाचोरा-15, पारोळा-18, रावेर-31, यावल-13 असे एकूण 265 गावांचा समावेश करण्यात आला असून यात 98 गावांमध्ये रेट्राफिटींग तर 167 गावांमध्ये नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यास 58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 103 गावांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

Next Post
‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा;विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d