Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नको ती सीडी आणि नको ती ईडी, आम्हाला हवी आहे आमच्या जिल्ह्याची पूर्वीची घडी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(डॉ धर्मेश पालवे):-


गेल्या दहा वर्षचा इतिहास पाहिला तर जळगाव जिल्ह्यातील काही निवडक राजकीय घडामोडी समोर येतात ज्या घटनांमुळे जळगाव शहरातील व त्या मागोमाग महाराष्ट्रात सूर असणारे राजकीय वारे उलट सुलट प्रतिक्रिया च्या रुपात भरते आणत आहे असं चित्र आहे.

काही दिवसांपासून ईडी यंत्रणेने विविध पक्षाच्या राजकारणी लोकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. तर मा गिरिषभाऊ महाजन यांनी आम्ही इडी लावली तुम्ही सीडी लावा असे प्रत्युत्तर दिले. आणि या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा महाराष्ट्र सह जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मालमत्ता जप्ती ची कारवाई ही त्या घटनांमधील एक कारवाई होती हे आपण पाहिला आहे. यावरून केंद्र सरकार ईडी यंत्रणेला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहेत, पोपट बनून पोलिसांनी राहू नये, या सह सूडाच्या भावनेपोटी ईडी कारवाई करत आहे असे आरोप विविध राज्यकर्त्यांनी केले आहे.

मात्र, ईडी आणि सीडी च्या या गोतावळ्यात आमचा जळगाव जिल्हा धुवून निघाला आहे हे मात्र निश्चित आहे. दोन दिगग्ज नेते, दोन वेगवेगळ्या मतप्रवाहाचे राजकारणी, आणि कधी कालचे एकाच पक्षाचे मोठे नेते जेव्हा आमने सामने एक मेकावर आरोप करतात तेव्हा जळगाव जिल्ह्यात समर्थकाकडून चर्चा व काही अंशी तोंडसुख घेतले जाते असे वातावरण होते.खर सांगायचं तर आमच्या जळगाव ला मनपा, जिल्हा परिषद,सारख्या संस्था चे खुप कामे बाकी आहेत. काही भ्रष्टाचार आहेत जे अजूनही समोर येत नाहीत.जिल्हातील भ्रष्टाचार राज्यभर गाजतात परंतु त्याकडे याच राज्यकर्त्याकडून दुर्लक्ष होत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.


शिक्षण क्षेत्रातील फी वाढ, शेतकरी वर्गाच्या समस्या, बेरोजगारांचा प्रश्न,आणि सामान्य जनतेच्या अशे कित्येक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत,जिल्हा विकासाला हातभार पाहता याकडे एकाही राज्यकर्त्याच भाषण, आंदोलन, किंवा साधा विरोध किंवा समर्थन आम्हाला दिसत नाही. का असेल अशी अवस्था जळगावकरांची. ईडी च्या आणि सिडीच्या गप्पा मारून या सर्व समस्या सुटतील का? नवीन नवीन आरोप करत जनतेला वेडे ठरवलं जात आहे का? की ,पुढील निवडणुकीत आपलं पारडं जड करण्यासाठीची ही खेळी आहे? असे प्रश्न समोर आ करून उभे आहेत.असो पण ,ईडी आणि सीडी ने काही साध्य होवो अथवा न होवो परंतु या पोलखोल मुळे जळगाव करांच्या वाट्याला काय येईल कोणास ठाऊक. गेल्या 10 वर्षीच्या आधी जी विकासाची घडी होती ती पुन्हा तशीच बसावी अशी जिल्ह्यातून आशा व्यक्त होत आहे.यावरून अस म्हणणं वावग ठरणार नाही की; नको ईडी नको ती सीडी आम्हाला हवी आहे आमच्या जिल्ह्याची पूर्वीची घडी..

सदर लेख डॉ धर्मेश पालवे जळगाव यांनी शब्दबद्ध केला असून ते राजकीय लेखन करतात.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गिरणा पाटबंधारे विभागाकडून पुराची धोक्याची सूचना;प्रशासनाने काळजी घेण्याचे कळविले

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात अध्यापक प्रबोधनी कार्यक्रम संपन्न

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात अध्यापक प्रबोधनी कार्यक्रम संपन्न

प.वि.पाटील विद्यालयात अध्यापक प्रबोधनी कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d