Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा

पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती दि. ११ : राज्यात धनगर समाजातील किमान दहा हजार लाभार्थ्यांना घरे देण्याचा शासनाचा निर्णय आहे. या आवास योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेत अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

Maha Info Corona Website

भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून यापुढे ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना म्हणून संबोधण्यात येणार आहे. योजनांमधून इतर मागासवर्गीय समाजातील सर्व महामानवांचे कार्य लोकांपर्यंत जावे. नव्या पिढीला जुन्या महान व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कार्याचा इतिहास कळावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना हे नामकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

इतर आवास योजनांच्या कामालाही गती देण्याचे निर्देश

जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहू नये. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा. या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरे मिळवून देण्यासह प्रधानमंत्री आवास योजना व विविध आवास योजनांच्या कामांनाही गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनुसार प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत यासह विविध योजनाही राबविण्यात येतात.

प्रधानमंत्री आवास योजना सन २०१९-२० करिता २४ हजार १२५ लक्षांक प्राप्त असून या पैकी १६ हजार ९५६ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणाली द्वारे मंजुरी देण्यात आली आहे. पहिला हप्ता  १५ हजार १५२ तर दुसरा हफ्ता ११ हजार ३२०,  तिसरा हफ्ता ८ हजार ६१० लाभार्थ्यांना देण्यात आला असुन ५ हजार २८६ एवढी घरकुले पूर्ण आहेत. रमाई आवास योजनेत सन २०१९-२० करिता ३ हजार लक्षांक प्राप्त असून यापैकी २ हजार ३२२ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे देण्यात आली आहे.

शबरी आवास योजनेत सन २०१९-२० करिता २ हजार लक्षांक प्राप्त असून पैकी १ हजार ५०६ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. पहिला हप्ता ६७९ तर दुसरा हफ्ता ४७९ व तिसरा हफ्ता ३१० लाभार्थ्यांना देण्यात आला असुन १०८ एवढी घरकुले पूर्ण आहेत. पंडित दीनदयाळ जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत अद्यापपर्यंत २४८ लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्याकरिता निधीचे अर्थसहाय करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ७५ लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत लाभ देण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती द्यावी

Next Post

पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची वसमत येथील रुग्णालयास भेट

Next Post
पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची वसमत येथील रुग्णालयास भेट

पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची वसमत येथील रुग्णालयास भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d