Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

…याला म्हणतात खरं प्रेम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2020
in राष्ट्रीय, लेख, विशेष
Reading Time: 1 min read

एकत्र मुव्ही पहाणं, बाहेर फिरणं, हॉटेलमधे जाणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, तास न तास एकमेकांच्या सहवासात जोडलेले रहाणं म्हणजे खरं प्रेम नव्हे…

एखाद्याच्या प्रेमात पडायला एक क्षणही पुरेसा असतो पण त्याच प्रेम मिळायला किती दिवस,किती वर्षं लागतील अंदाज नसतो. प्रेम मिळणं इतकं सोप्पं असतं का? नशिबवान असतात ते ज्यांना ते मिळतं. प्रेमाचा खरा अर्थ समजून न घेता बऱ्याचदा भावनिक आकर्षणालाच प्रेम समजून प्रेम करणाऱ्यांची संख्या इथं चिक्कार आहे.

एकत्र मुव्ही पहाणं, बाहेर फिरणं, हॉटेलमधे जाणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, तास न तास एकमेकांच्या सहवासात जोडलेले रहाणं म्हणजे खरं प्रेम नव्हे. या साऱ्या गोष्टी भावनिक आणि क्षणिक सुखाच्या यात प्रेम कमी आणि आठवणीच जास्त यातून माणूस कळत नाही. प्रेमात माणूस कळायला हवा.

त्याला समजून घेण्यासाठी वेळ लागतोच. त्याचं मन आणि विचार जाणून घेणं खूप महत्वाचं आणि हे तेंव्हाच कळतं जेंव्हा तुम्ही त्याच्या मनाशी कनेक्ट होता. ज्या मनात एकमेकांविषयी आंतरिकओढ, काळजी, आदर, आपुलकी आहे. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून समोरच्याला आनंदी करण्याची धडपड आहे. तिथेच खरं प्रेम आहे!

जी व्यक्ती तुम्हाला सोडून जाते ती मनाने तुमच्याशी कधीच कनेक्ट झालेली नसते. कुठल्याही परिस्थितीत मनाने जोडलेली व्यक्ती कायम तुमच्या सोबत राहते. आपल्या जाण्यानं समोरच्याला किती त्रास होेईल हे नक्की तिला समजतं.

बऱ्याचदा समोरच्याला तुमच्याबद्दल काय वाटते? त्याच्यासाठी सुध्दा हे नातं तितकंच महत्वाचं आहे का? ती व्यक्ती तुमच्यात मनापासून खरंच गुंतलीय का? ती आपल्याला तितकाच जीव लावतेय का? हे काहीही जाणून न घेता तुम्ही वेड्यासारखं प्रेम करता, जीव लावता. खूप घाई करता. तुमच्या असण्याने किंवा नसण्याने जर तिच्या आयुष्यात काही फरक पडत नसेल. त्या व्यक्तीची तुमच्याशी केवळ भावनिक संलग्नक असेल तर तिच्या मागे न धावता वेळीच नात्यातून बाहेर पडायला हवं. हा निर्णय तुमच्यासाठी खूप अवघड असतो. पण मन शांत ठेवून तो घ्यायचाच असतो. मनावर कुठलाही ओरखडा न उमटता नात्यातून शांतपणे बाहेर पडायचं असतं.

आयुष्यात घडलेल्या अशा प्रसंगातून एकच शिकायचं की समोरच्या व्यक्तीला आपलं प्रेम कळालं नाही म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. तुमचं निरपेक्ष, निःस्वार्थ प्रेम नाकारून ती जात असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमाच्या लायकीची नव्हतीच. तुमची निवड चुकीची होती.

आयुष्य नेहमीच जगण्याची नवीन संधी देतं. एक दार बंद झालं की दुसरं आपोआपच उघडतं. याहूनही खास कुणीतरी तुमच्यावर प्रेम करणारं. नक्कीच तुमची वाट पाहात थांबलेलं असेल!

•••••••••••••••• संकलन ••••••••••••••••••••
अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण
( एम.ए.अर्थशास्त्र )
एल.एल.बी.,पीजी.डी.आय.पी.आर.
सी.सी.डी.सी.अपार्टमेंट पहिला मजला, प्लाँट नं.०२ समर्थ काँलनी हाँटेल पांचाली जवळ,प्रभात चौक जळगाव, ४२५००१
[email protected]

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराणी ताराराणी यांची समाधी बांधण्याची परवानगी द्यावी- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d