Saturday, January 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

 “युद्ध नको” पत्रलेखन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, दि. 15 (प्रतिनिधी) – येथील  गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे सध्याच्या युक्रेन आणि रशिया या दोन देशातील युद्ध यासारख्या ज्वलंत विषयावर एक चांगला संदेश देण्याच्या दृष्टीने पत्रलेखन मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत शांती प्रस्थापित व्हावी व युद्ध नको अशा आशयाचे संदेश पत्राद्वारे लिहून आपले विचार गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे प्रस्तुत करावयाचे आहे. पत्र लेखनासाठी 20 मार्च 2022 पर्यंत अवधि देण्यात आलेला आहे. नागरिकांना नम्रपणे आवाहन आहे की, त्यांनी ‘युद्ध नको’ या पत्रलेखन मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

या मोहिमेसाठी भारताच्या सर्व नागरिकांना सहभागी होता येईल. परंतु त्यातल्या त्यात संवेदनशील नागरिक / शिक्षक / विद्यार्थी सहभागी झाले तर उत्तमच!सध्या रुस – युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून त्याला दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये कायम लष्करी डावपेच अर्थात युद्धनीतीच्या आधारावर अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो.
युद्धाचा राष्ट्रांच्या आरोग्यावर आणि आरोग्यावर मोठा घातक परिणाम होतो. अभ्यासातून व अनुभवातून  असे दिसून आले आहे की संघर्षाच्या परिस्थितीमुळे कोणत्याही मोठ्या रोगापेक्षा जास्त मृत्यू आणि अपंगत्व येते. युद्धामुळे समुदाय आणि कुटुंबांचा नाश होतो आणि अनेकदा राष्ट्रांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात बाधा येते. मृत्यू, दुखापत, लैंगिक हिंसा, कुपोषण, आजारपण आणि अपंगत्व हे युद्धाचे सर्वात धोकादायक शारीरिक परिणाम आहेत, तर पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), नैराश्य आणि चिंता हे काही भावनिक परिणाम आहेत.


         समाजाचा सर्वात लहान घटक प्रत्येक मनुष्याने “युद्ध नको”चा आग्रह धरल्यास, जागतिक समुदायाने शांततेच्या कारणांबद्दलची समज विकसित करून विकास आणि शांततेचे समर्थन करणार्‍या गोष्टींचा आग्रह धरल्यास युद्धविरहित जग केवळ शक्य नाही तर अपरिहार्य आहे. “वसुधैव कुटुंबकम !” मानणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पाईकाने हा आग्रह धरला पाहिजे. यासाठीच गांधी रिसर्च फाऊंडेशनने “युद्ध नको” मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमे अंतर्गत आपण जगातील महासत्ता असणाऱ्या देशाच्या प्रमुखांना, नाटो प्रमुखांना पत्र लिहावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदर पत्र लिहून आपण संस्थेकडे पाठवावे.  सर्व पत्र एकत्रित करून गांधी रिसर्च फाऊंडेशन या मोहिमेत सहभागी झालेल्यांच्यावतीने संबंधितांपर्यंत पोहोचवतील. या पत्रलेखन मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. अश्विन झाला (9404955272), गिरीश कुळकर्णी (9823334084), चंद्रशेखर पाटील (9404955220) यांच्याशी संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागरुकता हाच ग्राहकांसाठी मूलमंत्र होय – प्रा.सुरेश कोळी

Next Post

शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या बैठकीत डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

Next Post
शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या बैठकीत डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या बैठकीत डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d