Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

येवला-एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ चे भूसंपादन न करताच रुंदीकरण – मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे दिले आदेश “

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील येवला-नांदगाव-सायगाव-पिलखोड-दरेगाव-भडगाव-एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ चे ३० मीटर पर्यंत रुंदीकरणाचे तसेच सुधारणा करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तब्बल १८१ किलोमीटर लांबीच्या ह्या रस्त्याचे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असताना ग्राम विकास विभागाने गेली ४० ते ५० वर्षे कधीही भूसंपादन केलेले नाही, पैकी गुढे, ता. भडगाव, जि. जळगाव येथील शेतकरी नामे कैलास जुलाल पाटील व शांताराम जुलाल पाटील यांनी शासनाच्या ताब्यात असलेल्या व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या ६ मीटर रुंदीपेक्षा जास्तीच्या लागणाऱ्या त्यांच्या जमिनीचा ताबा देण्यास विरोध दर्शविला होता.

शासन दरबारी तशा वेळोवेळी तक्रारी करून गाऱ्हाणे मांडले होते. उप-विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप-विभाग, भडगाव यांनी जमिनीचा मोबदला देण्यास नकार कळवला असल्याने उपरोक्त शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे धाव घेतली असून त्यांच्या रिट याचिका क्र. ३२९२/२०२२ ची सुनावणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांच्या न्यायपीठासमोर दिनांक ८ मार्च, २०२२ रोजी पार पडली. कैलास जुलाल पाटील व शांताराम जुलाल पाटील यांच्या वतीने ऍड. भूषण महाजन यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की रुंदीकरणादरम्यान लागणाऱ्या जमिनीचे नवीन भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये कायदेशीर भूसंपादन होणे व त्यायोगे मोबदला मिळणे रास्त आहे. न्यायपीठाने प्रधान सचिव, कार्यकारी अभियंता, उप-विभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना नोटीस बजावत कायदेशीर मार्ग अवलंबल्या शिवाय रुंदीकरण न करण्याचे आदेश देताना पहिल्याच सुनावणीत रिट याचिका अंशतः निकाली काढली आहे. नाशिक व जळगाव ही दोन जिल्हे जोडणाऱ्या ह्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी भूसंपादनाची मागणी करीत आवाज उठवला होता परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत काम पूर्णत्वास नेले अशी तक्रार कित्येक शेतकऱ्यांनी केली आहे.

१८१ किलोमीटर एवढ्या लांबीच्या ह्या रस्त्यात हजारो शेतकऱ्यांच्या सरासरी अर्धा-पाऊण एकर एवढ्या शेतजमिनीवर मोबदला न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबा घेतला असून शेतकरी कायमस्वरूपी जमीन गेल्याच्या व मोबदला न मिळाल्याच्या दुःखात आहेत. ताबा घेतलेल्या जमिनी शासनाने नवीन भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये अधिसूचित करून मोबदला देण्याची तजवीत करावी अशी मागणी इतर शेतकऱ्यांकडून होत आहे. सदरच्या विषयात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार श्री. मंगेश चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ साहेबांची भेट घेऊन उपरोक्त विषय कानी घातला असून अध्यक्ष महोदय यांनी तात्काळ माहिती मागावण्याचे आदेश प्रधान सचिव, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांना दिले आहेत. उपरोक्त विषय अधिवेशन कालावधीत येत्या २५ मार्च पर्यंत विधानसभेत चर्चेत येण्याची शक्यता असल्याने जळगाव व नाशिक जिल्ह्यातील येवला-एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ च्या रुंदीकरण ग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ. अफजल देवळेकर सरकार यांना मा. राज्यपाल यांच्या हस्ते “समाज रत्न” देऊन सम्मान

Next Post

वडजी विदयालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

Next Post
वडजी विदयालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

वडजी विदयालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d