Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाउनमुळे समाजातील मुलांवर होणारे परिणाम-रीना जैस्वार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in लेख
Reading Time: 1 min read
लॉकडाउनमुळे समाजातील मुलांवर होणारे परिणाम-रीना जैस्वार

कोरोना महामारीने जागतिक पातळीवर थैमान घातले असल्यामुळे याचा थेट परिणाम हा सर्व सामान्य लोकांच्या जीवनावर झाला , ज्यात सर्वच वयोगटातील लोकांना वेगवगळ्या प्रश्नांना समोरे जावे लागत आहे . कारण भारत सरकारने देशभरात लॉकडाउन जाहिर केल्यानंतर सर्व लोक आप आपल्या घरात बंदिस्त झाले आहेत , व त्यांची दैनंदिन दिनक्रीया बन्द झाली , जेणेकरुन हा आजार पसरू नये , परन्तु कोरोना आजारचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याचा प्रादुर्भाव लहान मुलांना होण्यची शक्यता जास्त आहे , कारण त्यांची रोगप्रतिकार करण्याची क्षमता इतरांपेक्षा कमी असते .

अशा परिस्थितीत आपण जर समाजातील मुलांचा विचार केला तर , हा घटक सर्वात जास्त वलनेरबल आणि मार्जिनल आहे , म्हणून आपली मुले कोणत्या मानसिकतेतून जात असतील याचा आपल्याला अंदाज येतो . कारण मुलांना सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत त्यांचे स्वताचे वेळापत्रक असते , ज्यात या मुलांचे वेळ निघुन जात असे , परन्तु आता सर्वच लोक बंदिस्त असल्याने त्यांना बाहेर जाता येत नाही. अशातच सर्वात जास्त परिणाम मुलांच्या मनावर झाल्याचे निदर्शनात येत आहे. कारण ही मुले घरी बन्दिस्त झाल्याने चिडचिडी झाली आहेत , त्यांना राग पट्कन येवू लागला आहे, त्यांचा स्वभावात आणि वर्तणुकीत बदल घडत आहे , आपण जर समाजातील सर्व साधारण मुलांचा विचार केला तर , या मुलांना किमान आपल्या मनातील गोष्टी व भावना घरातील लोकांना सांगता येते , जेणेकरुन या मुलांना काही प्रमाणात आपल्या मनाप्रमाने वागता येते , स्वताला व्यक्त करता येते , आपले मत किंवा विचार मांडता येते , ज्यामुळे घरातील पालकांना त्यांची मानसिकता समजून घेता येते .

म्हणूनच भारत सरकारने बाल हक्क संहिता पारित करून सर्व बालकांचे अधिकार जपाण्यास आपण कटिबद्ध अशी भूमिका घेतली आहे , जेणेकरून प्रत्येक मुलांना त्यांचे बालपण जगात येईल आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून ते दूर राहतील , म्हणूनच आपल्या देशात बालहक्क चळवळ सुरू झाली , ज्याचा परिणाम म्हणून देशभरात मुलांसाठी बाल न्याय अधिनियम , पोस्कॉ कायदा , बाल कामगार निर्मूलन कायदा यासारखे अनेक वेगवेगळे कायदे निर्माण करण्यात आले , जेणेकरून मुलांचे संरक्षण करता येईल आणि त्यांना आपले अधिकार बजावता येईल , म्हणूनच त्यात प्रत्येक मूल हे विशेष व स्वतंत्र घटक आहे हे तत्व आपण मान्य केले , कारण मुलांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही मोठ्या लोकांची आणि समाजाची आहे , परन्तु ज्या मुलांना समाजातून वेगळे करण्यात आले व अशा मुलांची रवानगी काही कारणास्तव बालगृहात , कारागृहात , शेल्टरमधे करण्यात आली , त्या सर्व मुलांच्या मानसिकतेवर या लॉकडाउनचे सामाजिक , मानसिक , शारिरीक आणि भावनिक काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास आणि विचार होणे गरजेचे आहे , कारण आपण आता अपवादात्मक परिस्थितीत जगत आहोत , तर ही मुले कोणत्या संघर्षाचा सामना करत असतील हे आपण समजुन घेतले पाहिजे .

कारण लॉकडाउन पुर्वी या सर्व मुलांना किमान वेगवगळ्या गोष्टीत व कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत असत , ज्यात त्यांना स्वतःच्या कलागुणांना व एकन्दरीत त्यांचात बाल विकास होण्यास मदत होईल अशी संधी त्यांना मिळत असे , तसेच या मुलांची भेट घेण्याकरिता महीन्यातून एकदा त्यांचे पालक किंवा सामाजिक कार्यकर्ता जात असे , ज्यामुळे त्यांचे भावनिक व सामाजिक नातेसंबध सकारात्मक अणि सद्दृढ असे , ज्यात ते मुलांचे भावविश्व समजून घेत असे , परन्तु आता या परिस्तिती मुलाखत घेणे किंवा गळाभेट घेणे शक्य होत नसल्याने मुलांच्या मनावर नकारात्मक भावना निर्माण होवू शकते , ज्यामुळे मुलांमधे चुकीचे भावना किंवा न्यूनगंड निर्माण होवुन त्यांना चुकीचे विचार व भावनांना समोरे जावे लागले .

म्हणून बाल हक्कांसाठी काम करणार्या संस्थांनी यासाठी प्रयत्न करुन पुढाकार घेतला पाहिजे , जेणेकरुन मुलांचे सर्व बाल अधिकार अबाधित रहातील , तसेच सरकारने अणि प्रशासनाने ही विशेष बाब म्हणून लक्षात घेवुन या सर्व बन्दिस्त मुलांना वेळोवेळी मानसिक समुपदेशन व सामाजिक मदत कशा प्रकारे पुरविता येइल , याचा खास विचार करुन सर्वसमावेशक निर्णय आणि भूमिका घेतली पाहिजे , जेणेकरुन या मुलांचे बाल हक्क अबाधित रहातील आणि मुले आनंदी जिवन जगू शकतील . कारण देशात अणि राज्यात अजुन किती काळ ही परिस्थिती राहिल हे सांगता येणार नाही, म्हणून सरकारने यावर तातडीने उपाय योजना आखली पाहिजे, जेणेकरुन आपल्याला मुलांचे बालपण आणि हक्क सुरक्षित राखता येइल .

आपली ,
रीना जैस्वार .
( BA/MSW )
सामाजिक कार्यकर्ती
प्रयास संस्था (टिस प्रकल्प )
M – 8655926795.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पुण्यात कोरोना प्रतिबंधासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल

Next Post

मुलभुत प्रशिक्षणातंर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन पोर्टल कार्यान्वीत

Next Post
वडलीत स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे तिन-तेरा; तर लाभार्थ्यांना अन्नधान्याचे कमी वाटप

मुलभुत प्रशिक्षणातंर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन पोर्टल कार्यान्वीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d