Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई दि.११- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४७०  गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४७० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३१ N.C आहेत) नोंद १० जून २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी  १९१  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ५० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या पोलीस विभागात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४० वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने परिसरातील एका डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या व्हाट्सअपद्वारे विविध व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केली होती . त्यामुळे परिसरात अफवा पसरून काही काळ संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

वेबसाईट सुरक्षिततेची खात्री करा

सध्याच्या काळात, सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, जर तुम्हाला मद्य खरेदी करायचे असल्यास सदर ॲप किंवा वेबसाईट  वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची  खात्री करा व मगच  वापरा ,तसेच कुठल्याही अॅपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका. शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अॅपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

Next Post

कोरोणाला लढा देण्यासाठी मोहातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत सक्षम

Next Post
कोरोणाला लढा देण्यासाठी मोहातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत सक्षम

कोरोणाला लढा देण्यासाठी मोहातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत सक्षम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d