Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाघुर डावा व उजवा कालव्यातून पाणी आवर्तनासाठी 9 मे पर्यंत अर्ज करावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत


जळगाव, (जिमाका) दि. 6 – वाघुर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा व उजवा तसेच जलाशय उपसातून चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यानुसार उन्हाळी हंगामासाठी व बारमाही भाजीपाला, तेलबिया, कडधान्य व भुसारपिके इत्यादि पिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षणा व्यतिरिक्त उपलब्ध साठ्यातून पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अटींची पुर्तता करू शकणाऱ्या शेतकऱ्यांनी नमुना क्रमांक 7 पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज 9 मे 2020 पर्यंत सादर करावेत. सदरचे अर्ज वाघुर धरण उपविभाग क्रमांक 1 व 2 वराडसिम वाघुर धरण उपविभाग क्रमांक 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्यात यावे.

आवर्तनातुन सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी अटी व शर्ती अशा आहेत. उन्हाळी हंगाम 2019-2020 अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील. पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजूरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी तसेच प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजूर क्षेत्रासच व मंजूर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तिका संबंधित उपविभागा दाखवावी लागेल. पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजूरी देण्यात येईल.
या अटी असून त्याचे पालन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे जास्तीतजास्त उत्पन्न काढावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना लढाईतील योद्ध्यांसाठी भांडूप येथील सनराईस रुग्णालयला पालिकेने केले पुनरुज्जीवित

Next Post

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post
जिल्यातील 15 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाकडून जाहीर

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo