Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतीसाठी दिवसा सलग वीजपुरवठा करून बळीराजाचे हाल थांबवा-स्वप्निल सोनवणे यांचे मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्रींना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शेतीसाठी दिवसा सलग वीजपुरवठा करून बळीराजाचे हाल थांबवा-स्वप्निल सोनवणे यांचे मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्रींना निवेदन

जळगाव- लॉकडाऊनमुळे राज्यात उद्योग-व्यवसाय बंद असल्याने विजेची मागणी कमी आहे.तर दुसरीकडे शेतीला रात्री वीज मिळत असल्यामुळे बळीराजाला दिवसासह रात्रीही राबावे लागत आहे.सद्य:स्थितीत पुरेशी वीज उपलब्ध असल्याने कृषिपंपांसाठी ही वीज दिवसा सलग द्यावी,अशी मागणी तालुक्यातील नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना मेलद्वारे निवेदन दात केली आहे.


सध्या ग्रामीण भागातील शेती पंपांना आठवड्यातून चार दिवस तेही रात्रीच्या वेळेमध्ये वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी संतप्त झाला आहे. रात्रीच्या वेळी अंधारात पिकांना पाणी देताना जंगली श्वापदांचा धोका होण्याचा संभव आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन संपू्र्ण आठवडाभर दिवसा वीज पुरवठा करावा.दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी वारंवार करुनही ती मान्य केली जात नाही. वीज मंडळाला दिवसा वीज पुरवठा करण्यात काही मर्यादा असतील पण लॉकडाऊनमुळे औद्योगिक वसाहत मधील कारखाने बंद होते व यामुळे विजेची बचत मोठ्या प्रमाणावर झालेली असून पुरेशी वीज उपलब्धी झालेली आहे.


यामुळे औद्योगिक वसाहतींमधील कारखाने, सरकारी कार्यालयांमधील वीज पुरवठ्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही दिवसा सलग वीज पुरवठा करून बळीराजाचा सन्मान करावा. इतर अनेक राज्यात शेती व्यवसायाला महाराष्ट्राच्या तुलनेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच किमान या पायाभूत सुविधेचा विचार करावा.यामुळे बळीराजाचे हालही कमी होतील व यंदाच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल.यामुळे राज्यात सर्वत्र कृषिपंपांना दिवसा सलग वीजपुरवठा सुरु करावा,अशी विनंती यावेळी स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या निवेदनामार्फत केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सलग दुसऱ्या दिवशी वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा परप्रांतीय मजुरांना मदतीचा हात

Next Post

जीवाची बाजी लावणारे कोरोना फायटर्स आता राहणार सुरक्षित, रायसोनी महाविध्यालयाचा स्तुत्य शोध

Next Post
जीवाची बाजी लावणारे कोरोना फायटर्स आता राहणार सुरक्षित, रायसोनी महाविध्यालयाचा स्तुत्य शोध

जीवाची बाजी लावणारे कोरोना फायटर्स आता राहणार सुरक्षित, रायसोनी महाविध्यालयाचा स्तुत्य शोध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo