Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून कळंब तालुक्यातीलसर्व आस्थापना 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून कळंब तालुक्यातीलसर्व आस्थापना 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

कळंब,प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्ववलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहेत.    महाराष्ट्र शासनाने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी  दि.17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.यातील मुद्दा क्र.2 (i)नुसार ग्रीन,ऑरेज व रेड (हॉटस्पॉट)झोनबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे.तसेच मुद्दा क्र.(ii)नुसार करोना (COVID-19) चा प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हयातील रेड झोन (हॉटस्पॉट) व ऑरेज झोन चा भाग निश्चित करणेबाबत अधिकार देण्यात आला आहे.    उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यामध्ये कोरोना विषाणू (COVID-19)चे रुग्ण आढळून आले असल्यामुळे कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कळंब तालुक्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षा दीपा मुधोळ- मुंडे यांनी कोरोना विषाणू (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी  टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील खालील आस्थापना वगळून.1.शासकीय/निमशासकीय कार्यालये.2.पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.3.सर्व बँका.4.दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.5.अन्न,भाजीपाला,दूध.6.किराणा पुरविणा-या आस्थापना (सकाळी 8 ते  दुपारी 2 या कालावधीतच सुरु राहतील.)7.दवाखाने,वैदयकीय केंद्र व औषधी दुकाने.  

8.विदयुत पुरवठा,ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने.9.प्रसार माध्यमे,मिडीया.10.अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी.आस्थापना.वरील आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील सर्व  आस्थापना व दुकाने दि.17 मे 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित केले आहे.       

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प., उस्मानाबाद पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद, कळंब उपविभागीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन अधिकारी, न. पा. प्र. जि. का. उस्मानाबाद, तहसिलदार कळंब, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळंब, तालुका आरोग्य अधिकारी, कळंब ,मुख्याधिकारी नगर परिषद, कळंब. कळंब तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल.या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापना अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपायोजना नियम-2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी दिनांक  12 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायत कडून आशा कार्यकर्ती माध्यमातून ग्रामस्थांना २००० सँनिटायझरचे वाटप

Next Post
कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायत कडून आशा कार्यकर्ती माध्यमातून ग्रामस्थांना २००० सँनिटायझरचे वाटप

कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायत कडून आशा कार्यकर्ती माध्यमातून ग्रामस्थांना २००० सँनिटायझरचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo