Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमळनेर व पाचोऱ्याच्या धर्तीवर जळगाव, भुसावळमध्ये थ्री लेअर पध्दतीचा अवलंब करा- जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 18 – अमळनेर व पाचोऱ्यात ज्याप्रमाणे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तींच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध (थ्री लेअर पध्दत)  घेऊन त्यांचे स्वॅबचे नमुने तपासण्यात आले त्याच धर्तीवर जळगाव, भुसावळच्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पध्दत वापरा. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज संबंधित यंत्रणेला दिलेत.

            जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा लवकरच सुरु होणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर व पाचोऱ्यात ज्याप्रमाणे काम करण्यात आले त्या धर्तीवर जळगाव व भुसावळमध्ये तपासणी मोहिम प्राधान्याने राबवावी. याकरीता कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील व लोरिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. लोरिस्कमधील व्यक्तीमध्ये लक्षणे असल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणीस पाठवावे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक यांनी गावातील नागरीकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे तंतोतंत पालन झाले पाहिजे यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

त्याचबरोबर जिल्ह्यातील कापूस विक्रीसाठी सीसीआय मार्फत केंद्र सुरु करण्यात येत आहे. याठिकाणी प्रत्येक दिवशी किमान 50 शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर टोकन देऊन त्यांचे कापूस खरेदी करावी. टोकन दिलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घेतल्याशिवाय केंद्र बंद करु नये. तसेच मका व ज्वारी खरेदीसाठी केंद्र सुरु करण्यात येणार त्याठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी येवू नये तसेच व्यापारी मालाची कटाई जास्त करणार नाही याकरीता सहकार व पणन विभागाने प्रत्येक तालुक्याच्या सहकार अधिकाऱ्यास उपस्थित राहून तपासणी करण्याचेही निर्देश दिले.

 यावेळी जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात व राज्यात जाणारे व येणारे मजूर, नागरीक  तसेच बेघर, गरजू व गरीबांना अन्न वेळेवर मिळेल याबाबतचाही त्यांनी आढावा घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचाकालावधीत दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढ

Next Post

मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

Next Post
मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d