Thursday, July 24, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘आपका मन से शुक्रागुजार हूँ !’ – स्वगावी पोहचल्यावर कामगारांनी व्यक्त केल्या भावना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
‘आपका मन से शुक्रागुजार हूँ !’ – स्वगावी पोहचल्यावर कामगारांनी व्यक्त केल्या भावना


वर्धा , दि 21 (जिमाका):- कोरोनाच्या काळात प्रशासनाने अनेक आघाड्यांवर काम केले आहे. त्यातीलच एक संवेदनशील विषय होता तो म्हणजे परप्रांतीय मजुरांना थांबवून त्यांची संपूर्ण काळजी घेणे. त्यांना गावी पाठवताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे काम अतिशय नियोजनबद्धपणे तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी केले आहे . उत्तरप्रदेश मधील नूरपूर बीजनौर येथील कमलजीत सिंह यांनी स्वगावी पोहचल्यावर वर्धा तहसीलदार यांना “आपका मन से शुक्रगुजार हूँ, आप जैसे अधिकारी की इस भारत वर्ष को आवश्यकता है” असा संदेश पाठवून त्यांच्या कामाची एक प्रकारे पोचपावती दिली.


“नमस्कार मैडम हम समस्त उत्तर प्रदेश वासी आपकी सराहनीय सेवाओं के लिए आपका तहे दिल से अभिनंदन करते हैं तथा आपकी लंबी आयु के लिए प्रभु से कामना करते हैं! हमारे पूरे भारतवर्ष को आप जैसे अधिकारियों की ठीक आवश्यकता है अधिक कुछ ना कह कर मैं आपका मन से शुक्रगुजार करता हूं आपका भाई आपका शुभचिंतक कमलजीत सिंह। नूरपूर बिजनौर उत्तर प्रदेश”
प्रशासनात काम करीत असताना आपल्या कामाची दखल कार्यालयीन स्तरावर घेण्यात येते. त्यामुळे कामाचा हुरूप वाढतो. मात्र प्रशासनात संवेदनशीलपणे काम करताना अतिशय गरजू व्यक्तीना सेवेचा लाभ झाला आणि त्याबद्दल त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आणि त्याला झालेला आनंद यापेक्षा दुसरा कृतार्थ भाव असू शकत नाही. प्रशासनातील कामाची हीच खरी पोचपावती ठरते.


कोरोनाच्या काळात 5 टक्के कर्मचारी उपस्थितीवर काम करत असताना अनेकांनी दिवस रात्र काम केले. मजुरांचे स्थलांतर आणि त्यांना थांबविणे हा एक आव्हानात्मक विषय होता. पण वर्धेत सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे काम प्रशासनाने पार पाडले . अनेक स्थलांतरित कामगार मजुरांना वर्धा जिल्ह्यात थांबविण्यात प्रशासनाला यश आले. 61 निवरागृहात 8 हजार 400 व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये बहुतांश जबाबदारी सामाजिक संस्था, कंपन्या आणि कंत्राटदारांनी उचलली. प्रशासनाने त्यासाठी आवश्यक सोई सुविधा ज्या सामाजिक संस्थांना करणे शक्य नव्हते त्यासाठी हातभार लावला. यामध्ये अनेक जण पुढे आलेत.


असाच महत्वाचा टास्क, अडकलेल्या कामगारांना आपापल्या राज्यात सुखरूप पोहोचविणे सुद्धा आहे. शासनाने परप्रांतियांसाठी बस, रेल्वे उपलब्ध करून देत त्यांना घरी जाण्यासाठी दिलासा दिला. यातही जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी निवारागृहातील कामगारांच्या व्यतिरिक्तही शहरातील अनेक नागरिक, विद्यार्थी यांना शोधून त्यांच्या राज्यात जाण्यासाठी त्यांना मदत केली.


त्या कामाचे कौतुक खुद्द आपापल्या घरी पोहचलेल्या अशाच कामगारांकडून झाल्यावर कामाचे चीज झाले अशी भावना वर्धेच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी व्यक्त केली. त्यांना उत्तर प्रदेशच्या नूरपूर बीजनौर येथील कमलजीत सिंह या व्यक्तीने यांना संदेश पाठवून आभार व्यक्त केले. प्रशासनाच्या चांगल्या कामाची अनपेक्षितपणे मिळालेली ही पोचपावती आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्हा कोरोना अपडेटस

Next Post

पंढरपुरातून श्रमिक विशेष रेल्वेने ९१८ नागरिक झारखंडकडे रवाना

Next Post
पंढरपुरातून श्रमिक विशेष रेल्वेने ९१८ नागरिक झारखंडकडे रवाना

पंढरपुरातून श्रमिक विशेष रेल्वेने ९१८ नागरिक झारखंडकडे रवाना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
00:00
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications