Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंढरपुरातून श्रमिक विशेष रेल्वेने ९१८ नागरिक झारखंडकडे रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पंढरपुरातून श्रमिक विशेष रेल्वेने ९१८ नागरिक झारखंडकडे रवाना


पंढरपूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अडकलेले झारखंड येथील ९१८ नागरिक पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वेने झारखंडकडे रवाना करण्यात आले.


पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन दुपारी 2.00 वाजता झारखंडकडे ९१८ नागरिक रवाना करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, मंडलाधिकारी समीर मुजावर तसेच रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, वरिष्ठ अभियंता आर.एस गव्हाणे यावेळी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रशासनाकडून रेल्वेमध्येच पाणी व फुड पॅकेटची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात सामाजिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकात संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

सदर रेल्वे झारखंडमधील जासिडीह येथे शनिवारी रात्री ०१.३० वाजता पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
सोलापूर, लातूर तसेच सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या झारखंड राज्यातील ९१८ नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये माढा ८३, बार्शी ३६, मोहोळ ६७, पंढरपूर १३८, करमाळा १९६, सांगोला ७९, द.सोलापूर ८०, उ.सोलापूर-३०, अक्कलकोट ५०, माळशिरस २४, मंगळवेढा १८, तसेच लातूर-११, सांगली-५६, कवठेमंहाकाळ-०८, कडेगांव विटा ४२ अशा एकूण ९१८ नागरिकांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन स्वगृही रवाना करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘आपका मन से शुक्रागुजार हूँ !’ – स्वगावी पोहचल्यावर कामगारांनी व्यक्त केल्या भावना

Next Post

रेल डाक सेवा (आर एम एस) एल विभागाची निस्वार्थ सेवा सलग ४५ दिवसांपासून अखंडित सेवा

Next Post
रेल डाक सेवा (आर एम एस) एल विभागाची निस्वार्थ सेवा सलग ४५ दिवसांपासून अखंडित सेवा

रेल डाक सेवा (आर एम एस) एल विभागाची निस्वार्थ सेवा सलग ४५ दिवसांपासून अखंडित सेवा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications