Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खरीप 2020-21 हंगामाकरिता शेतकऱ्यांना नवीनपीक कर्ज उपलब्ध करुन देणेबाबत बँकास निर्देश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

उस्मानाबाद :-महाराष्ट्र शासनाने,शासन निर्णय दि.27 डिसेंबर 2019 अन्वये राज्यातील शेतक-यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019  जाहीर केली असून दि.01 एप्रिल 2015 ते दि.31 मार्च 2019 या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतलेल्या तसेच अल्पमुदतीच्या पिककर्जाचे पुर्नगठन/फेरपुर्नगठन केलेल्या कर्जाचे दि.30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत व परतफेड न झालेल्या रक्कम रु2.00 लाखापर्यंतच्या रकमेस माफी देण्याबाबची अंमलबजावणी चालू आहे. 

या योजनेअंतर्गत दि 18 मे 2020 रोजीपर्यंत 68665 पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.त्यापैकी दि.26 मे 2020 पर्यंत 54284 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून त्यापैकी 52030 शेतकऱ्याचे कर्जखात्यावर रक्कम रुपये 384 कोटी 97 लाख रक्कम जमा करण्यात आलेली आहे.यादी प्रसिध्दी झालेल्यापैकी 16635 शेतकऱ्यांची रक्कम बँकेस लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र शासनाने दि.22 मे 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे ज्या शेतकऱ्यांचे नांव कर्जमाफीच्या लाभार्थांच्या यादीत प्रसिध्द करण्यात आलेले आहे.परंतु त्यांच्या माफीची रक्कम बँकेस वर्ग करण्यात आलेली नाही अथवा ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा शेतकऱ्यांना खरीप 2020-21 हंगामाकरिता नविन पिक कर्ज उपलब्ध करुन देणेबाबत बँकास निर्देश दिले आहेत.     तरी उस्मानाबाद जिल्हयातील योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी बांधवानी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून नव्याने पीक कर्ज घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मजूरांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

Next Post

सिलबंद बाटलीतून मद्य विक्री करणा-याविक्रेत्यांसाठी शासनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

Next Post

सिलबंद बाटलीतून मद्य विक्री करणा-याविक्रेत्यांसाठी शासनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

    %d

      Notifications