Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण -अमित माळी; हरीपुरा येथील दफनभूमीत वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण -अमित माळी; हरीपुरा येथील दफनभूमीत वृक्षारोपण

जळगांव(प्रतिनिधी)- झाडांचे महत्त्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम, तोटे हे मानवाच्याच पदरात पडतं आहे. त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. यामुळे कृती फाउंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्मशानभूमी व दफनभूमीत वृक्षारोपण अन् संवर्धन मोहीम राबविली जात आहे.


याबाबत सविस्तर असे की, कृती फाउंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने फाउंडेशनचे माजी अध्यक्ष डी.टी.महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, हरित सेनेचे मास्टर ट्रेनर प्रवीण पाटील, सलीम तडवी यांच्या संकल्पनेतून यावल तालुक्यातील हरिपुरा येथील दफनभूमी सुशोभीकरणाकरिता वृक्षारोपण करुन विविध फुलझाडे आणि ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची रोपे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. प्रसंगी जलपुजन व सर्व रोपांचे पुजन करत वृक्षदिंडी काढून ग्रा.पं.सदस्य बिराद अनवर, चेतन निंबोळकर, मौलाना मजीत तडवी, शकूर तडवी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या उपक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फाऊंडेशनच्या वतीने कार्यध्यक्षा व माधवबागच्या क्लिनिकचे डॉ.श्रद्धा माळी, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, नजराना तडवी, वनीकरण विभागाच्या सौ.साळुंखे यांनी रोपे इन्सानियत ग्रुपला सुपूर्द केली. सदर उपक्रमासाठी कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, फाऊंडेशनच्या महिला आघाडीचे सरिता महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोउनी आय.आय.तडवी, वसुंधरा फाऊंडेशनचे सचिन पवार,साने गुरूजी फाऊंडेशनचे नरेंद्र पाटील,प्रा. नारायण पवार, गायत्री पल्सेसचे निखिल ठक्कर, सत्यमेव जयते न्यूजचे दिपक सपकाळे, विशाल शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रसंगी पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. सामाजिक वनीकरणाची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. तसेच निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून एकतरी झाड जगवा. असा संदेश व आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांसह अयाज तडवी, तुराब तडवी, अमजत तडवी, बिस्मिल्लाह तडवी, फकिरा अनवर, अकबर शेरखा, शरीफ तडवी आदी उपस्थित होते. गावात राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ८५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ८५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d