Wednesday, July 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘राष्ट्रीय युवा संसद’मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
‘राष्ट्रीय युवा संसद’मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा!

जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांचे आवाहन : केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजन

जळगाव, दि.२३ – तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडून यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. युवा संसदसाठी जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने संसद घेण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

तरुण, तरुणी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव जिल्ह्याची युवा संसद दि.२८ आणि २९ डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आवाहन


जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा, रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट फोटोसह आपले अर्ज नेहरू युवा केंद्र, प्लॉट क्र.६०, गट क्र.४०, द्रौपदी नगर, मानराज पार्कजवळ, जळगाव याठिकाणी कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी यांच्याकडे दि.२७ डिसेंबरपर्यंत जमा करायचे आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी फोन क्र.०२५७-२९५१७५४ किंवा qnykjal@gmail.com यावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष राहणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपला मुद्दा मांडता येणार असून राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषाच आवश्यक आहे.

महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी मांडणार मत


जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनीटे वेळ मिळणार आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान – समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकर्‍यांसाठी वरदान – शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व सादर करायचे आहे.

राष्ट्रीय स्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार


राज्यस्तरीय युवा संसदसाठी जळगाव जिल्ह्यात आयोजित स्पर्धेतून २ विद्यार्थी निवडले जाणार असून राज्यातून ३ विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि.१ ते ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि.१२ आणि १३ जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस २ लाख, द्वितीय १.५ लाख, तृतीय बक्षीस १ लाख असणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावची मानसी शर्मा ‘इंटरनॅशल आयकाॅनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया २०२०’ मानकरी

Next Post

बहुविध क्षेत्रात साने गुरुजींनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी

Next Post
बहुविध क्षेत्रात साने गुरुजींनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी

बहुविध क्षेत्रात साने गुरुजींनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications