Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक घेणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक घेणार

मुंबई , दि. 1 : असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात  05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गेल्या वर्षी लॉकडाऊन कालावधी वाढल्याने असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार आपापल्या गावी परत निघाले. त्यावेळी त्यांना परत जाताना खूप कष्ट घ्यावे लागले. अनेकजण कित्येक दिवस व कित्येक किलोमीटर चालत गेले रस्त्यात जेवणाची आबाळ झाली, राहण्याचीही गैरसोय झाली. विशेषतः लहान मुले व वयोवृद्धांना खूप त्रास सहन करावा लागला. या कालावधीत शासनाने विविध उपाययोजना केल्या. लाखो नागरिकांना शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे त्यांच्या परराज्यातील गावी मोफत सोडले. अनेक ठिकाणी जेवणाची सोय, राहण्याची सोय व वैद्यकीय सोय केली. गावी जाईपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाने खूप चांगले नियोजन केले, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

लॉकडाऊन उठल्यानंतर मिशन बिगिन अगेन सुरू झाले. अनेक कामगार पुन्हा आपापल्या रोजगाराच्या शहरामध्ये परतले, त्यांचा संसार पुन्हा योग्य पद्धतीने सुरू होतोय तोपर्यंत पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे त्यामुळे पुन्हा अनेक असंघटित कामगारांच्या मनात गावी जाण्याचे विचार सुरू झाले आहेत असे अनेक सामाजिक संघटना सांगत आहेत. अशा वेळी आकस्मिक निर्माण झालेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी  शासनाची  पूर्वतयारी असावी म्हणून लवकरच सार्वजनिक आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, परिवहनमंत्री, यांचे समवेत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सर्वांशी सविस्तर बोलणे झाले आहे. या बैठकीत असंघटित कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी व पत्रकार संशोधकांनाही निमंत्रित करणार आहोत, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या बैठकीत शासनाचे प्रवासासाठीचे नियोजन, अन्न, निवारा व वैद्यकीय सुविधांचे नियोजन बाबत चर्चा होईल. कोरोना रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ गोऱ्हे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. रेड्डी निलंबित

Next Post

महाआवास अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे

Next Post
महाआवास अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे

महाआवास अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d