Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक तेवढे रेमडेसीवीर व ऑक्सिजनचा पुरवठा २ दिवसांत सुरळीत न झाल्यास धरणे आंदोलन करणार -समता सैनिक दल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक तेवढे रेमडेसीवीर व ऑक्सिजनचा पुरवठा २ दिवसांत सुरळीत न झाल्यास धरणे आंदोलन करणार -समता सैनिक दल

     
जळगांव(प्रतिनिधी)- रेमडीसीवीरचा पुरवठा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडीसीविर मिळवण्याकरता पेशंटच्या नातेवाईकांना जीवाचे रान करून देखील रेमडीसीविर उपलब्ध होत नाही. किंबहुना ही यंत्रणा शासनाने ताब्यात घेणे अगोदर तरी दोनशे पाचशे रुपये जास्त देऊन का होईना रेमडीसीविर इंजेक्शन मिळत होते, परंतु ही यंत्रणा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडेसिविर मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे आणि जर मिळालेच तर काही हारामखोर १५ ते २० हजार रुपयांना विकत आहेत, आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की रेमेडेशिवरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शहरातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक हवालदिल तर झालेले आहेतच. पण त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक यांचा दोष नसताना त्यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेच्या मनात दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे आणि भविष्यात हकनाक एखादे हॉस्पिटल अथवा डॉक्टर किंवा कदाचित एखादा मेडिकल धारक या असंतोषाचा बळी पडू शकतो . कारण प्रत्येकाच्या जवळचे नातेवाईक , मित्र किंवा मित्रपरिवारातील कुणी ना कुणी प्रत्यक्ष डोळ्यासमोर मृत्यू पावत आहेत आणि म्हणून येत्या चार दिवसात जर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट (रुग्ण) आहेत तेवढे रेमडीसीविर आणि जेवढा आवश्यक आहे तेवढा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न झाल्यास दिनांक २३ एप्रिल रोजी समता सैनिक दल जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने तसेच वेळेवर रेमडीसीविर आणि ऑक्सिजन अभावी ज्यांचे आप्तस्वकीय मरण पावले आहेत ते पीडित असे सर्व मिळून जिल्हाधिकारी कार्यालया समोर कायद्याच्या चौकटीत राहून प्रचलित नियम पाळून धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपण आपले शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील. असे जिल्हाधिऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सदरील निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

Next Post

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र; कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo