Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2021
in राज्य, विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू

शिक्षण अधिकारी बुलढाणा यांनी बुलढाण्यात शिक्षण संस्था यांनी फि घेऊ नये असे आदेश काढलेले आहेत, असेच आदेश जोपर्यंत जळगाव शिक्षणाधिकारी व प्रशासन देत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार -दिपक सपकाळे-(सहसचिव -प्रदेश कमिटी)

जो पर्यंत पालकांची होणारी लूटमार थांबणार नाही तो पर्यंत मासू चे साखळी उपोषण सुटणार नाही:-ऍड.अभिजीत रंधे

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासु हि एक अराजकीय विद्यार्थी संघटना असून विद्यार्थ्यांच्या न्याय , हक्क आणि अधिकारांसाठी न्यायिक स्वरूपात महाराष्ट्र भर कार्य करीत असून अन्यायाच्या विरोधात बंड पुकारून लढा देत आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत साहेब व शिक्षणअधिकारी , शिक्षण सभापती जिल्हा परिषद, जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळवीला होता व त्यापासून विद्याथ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळावा अशी मागणी आम्ही केली होती परंतु कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र सुद्धा देण्यात आलेले होते.

तरी देखील अद्यापही कोणतीच ठोस कार्यवाही प्रशासना तर्फे करण्यात आलेली नाही जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून दिनांक २३/७/२०२१ म्हणजे आजपासून आम्ही सर्व शासकीय नियमांचे व आदेशाचे पालन करून अन्नत्याग साखळी उपोषण करीत आहोत.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासमोर जे आर्थिक संकट आले आहे त्यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघालेला आहे अशातच काही खाजगी शाळा ह्या मनमानी पध्दतीने विद्यार्थ्यांकडून फीस आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. टाळेबंदीमुळे गेल्या
दीडवर्षा पासून ऑनलाईन शिकवणी सुरु आहेत तरी देखील काही शाळा ह्या कोविड सुरू होण्याआधी जितकी फीस आकारली जात होतीच त्याप्रकारे आताही फी आकारत आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे पालक हतबल झाले असून त्यांच्याकडे वेळेवर फीस भरण्याची पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणीतून बेदखल केले जात आहेत त्यामुळे त्यांच्या पाल्यांवर शिक्षणापासून वंचित होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि भीतीपोटी आपल्या पाल्यावर अडचण येऊ शकते जसे की गुण कमी मिळणे ,त्या विद्यार्थ्यांवर काट खाणे किंवा कुठल्याही प्रकारे त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्यांचे उज्वल भविष्यात अडचणी येऊ शकता या खातीर पालक हे उघडपणे तक्रार करत नाही आहे.

तरी अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा काढून शाळेची फीस भरण्यास तयार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करता खासगी शाळांची मनमानी थांबवण्यासाठी आपण ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासना कडे वेळोवेळी मागणी केली होती कि खाजगी शाळेंनी फक्त शिकवणी शुल्क आकारून पालकांना फीस भरण्यासाठी सुलभ हफ्ते प्रदान करून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची गळचेपी थांबवावी परंतु प्रशासनाकडून कोणताच निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी अन्नत्याग साखळी उपोषण करावे लागत आहे.

दिनांक २३ जुलै पासून आम्ही जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव विभाग प्रमुख ऍड अभिजित जितेंद्र रंधे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग साखळी उपोषण करणार आहोत याची दखला घेण्यात यावी. जर कोणतीही जीवितहानी या उपोषण दरम्यान झाली तर त्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी प्रशासन आणि राज्य सरकार यांची असेल असे मासुच्या वतीने कळविण्यात आले आहे. उपोषणकर्ते ऍड. अभिजित रंधे ,ऍड. निलेश जाधव, दिपक सपकाळे, सचिन बिऱ्हाडे, चेतन चौधरी,निखिल बिरारी, संदीप कोळी, अतुल बनसोडे, संतोष भंगाळे, भावेश कोल्हे, ललित पाटील, यशोदीप महाले, महेश सगणे, आकाश धनगर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

केकतनिंभोरा या गावी वाघूर धरणाचे शुद्ध पाणी न मिळाल्याने पंचायत समिती येथे मनसे कडून आमरण उपोषणाचा ईशारा

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications