Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून जिल्हा निरोगी बनवूया -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून जिल्हा निरोगी बनवूया                                                      -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

        जळगाव – इलाज करुन आजार बरा करण्यापेक्षा आजार होवू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय योजल्यास निरोगी समाज निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी शासनाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान महत्वपूर्ण ठरेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. 

            येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय, जळगाव, राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र शासनमार्फत आयोजित आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त  डॉ. उदय टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे, डॉ. चांडक, महाजन, चिरमाडे, गाजरे आदि चिकित्सक, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध आजारांचे निदान व इलाजासाठी ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नागरीकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. बेटी बचाव, बेटी पढाव या अभियांनातंर्गत जिल्ह्याने चांगले काम केल्याने मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होवून मुलींचा जन्मदर 1 हजाराच्या तुलनेत 825 वरून 925 असा झाला आहे. या कामात सातत्य ठेवल्यास लवकरच मुलगा-मुलगी असा भेदा-भेद संपण्यास मदत होईल. आरोग्य विभाग, आरोग्य विभागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी आप-आपसात समन्वय ठेवून आरोग्याविषयक सुविधांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी बेटी बचाव, बेटी पढाव  या अभियानास जिल्हा आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या आवाहनाला साथ देत जिल्ह्यातील नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्याने मुलींच्या दरात लक्षणीय वाढ होवून जळगाव जिल्हा देशातील पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. जिल्ह्यात 26 ते 29  ऑगस्ट चार दिवसीय राष्टीय आरोग्य शिबीरात तपासणीस आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होवून सर्व तज्ञ डॉक्टरकडून  तपासणी, इलाज व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया सुध्दा केल्या जाणार असल्याचे सांगितले.                

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी ग्रामीण  भागातील जनतेकडून होत असलेल्या तंबाखूजन्य मिशिरीचा दात घासण्यसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना अशा लोकोपायोगी योजनांचा माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, डॉ. चांडक यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी तर आभार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डी. एस. पाटोडे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अजीम खान यांना राजस्थानी शिक्षक रत्न पुरस्कार

Next Post

२५ वर्षे आमचीचं सत्ता,मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Next Post

२५ वर्षे आमचीचं सत्ता,मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d