Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दर्जेदार वाचन शिक्षक व विद्यार्थी दोघांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीला समृद्ध करते -चंद्रकांत भंडारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
दर्जेदार वाचन शिक्षक व विद्यार्थी दोघांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीला समृद्ध करते -चंद्रकांत भंडारी

डॉ.अब्दुल कलाम पुस्तक भिशी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- “दर्जेदार वाचन शिक्षक व विद्यार्थी दोघांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीला समृद्ध करते” असे प्रतिपादन साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले. शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने शिक्षण महर्षी डॉ.जे. पी. नाईक व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने शिक्षकदिन दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित ऑन लाईन व्याख्यानात “शिक्षकांनी काय वाचावं? विद्यार्थ्यांपर्यंत ते कस पोहोचवावं” या विषयानुषंगे मार्गदर्शन करतांना साहित्यिक चंद्रकांत भंडारी बोलत होते.

वेळेच भानं व कोरोना निर्बंधाची जाणं ठेवून अध्यक्ष व प्रमुख अतिथीविना हा अनोखा प्रयोग ! मार्गदर्शनात भंडारी पुढे म्हणाले की, दर्जेदार ग्रंथवाचना एवढेच वृत्तपत्रांच्या पुरवण्या वाचनाने ताजे व वैविध्यपूर्ण विषयांमुळे सामाजिक मूल्यांचे भान व कर्तव्याची जाण येऊन वाड़मयीन अभिरुची वाढते. ज्ञानरचनावादी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील सृजनशील शिक्षक व प्रयोगशील शाळांची त्यांनी सोदाहरण माहिती दिली. तंत्रस्नेही शिक्षकांना सुद्धा आपल्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्तीसाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संवेदनशील भावनांचं वादळ समजून घेण्यासाठी वाचन करावं. विषयांतील सखोल ज्ञान व अध्यापन शास्त्रातील कौशल्य विकसित होण्यासाठी शिक्षक अपडेट व ॲडव्हान्स वाचन करीत नाहीत याची खंतही त्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत भंडारी यांनी मुंबईच्या लोकल प्रवासात जपलेलं पुस्तक वाचन वेड आणि हायस्कूल मध्ये साहित्यिक पु.ल.देशपांडे, भालचंद्र नेमाडे, शांता शेळके, शिरीष पै, शायर हरीवंशराय बच्चन यांच्याशी विद्यार्थ्यांशी भेट, प्रत्यक्ष वर्गात अध्यापन आणि सुसंवाद अशा अनोख्या प्रयोगातील गंमती जमतीसह किस्से सांगितले. विद्यार्थी उत्स्फूर्तपुर्ण वाचनाभिमुख व्हावे यासाठी कवी अशोक कोतवाल व अशोक कोळी यांनी राबविलेले अप्रतिम उपक्रमही सांगितले. प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी भंडारी सरांचा साहित्यिक प्रवास व के.सी. ई. सोसायटी समन्वयक म्हणून केलेले विद्यार्थी व पालक यांच्या संदर्भातील विशेष प्रबोधनपर उपक्रम परिचयात सांगितले.

भिशीतर्फे शिक्षक दिनाच्या औचित्याने लुल्हे यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन चंदकांत भंडारी यांचा भावपूर्ण सत्कार केला. आभार प्रदर्शन तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी केले. व्याख्यानास अंनिस ज्येष्ठ कार्यकर्ते डिगंबर कट्यारे व शिरीष चौधरी, सुप्रसिद्ध लेखक राजेंद्र पारे, डायेटचे किशोर पाटील, हर्षवर्धन भंडारी, सुनिता भंडारी, डॉ.विजय बागूल, उषा सोनार, गजश्री पाटील, सुजाता निकम, वंदना वानखेडे, अरुण पाटील, श्रीकांत मोटे, अथर्व गुरव, बाळू पाटील यांचेसह ग्रंथप्रेमी शिक्षक व रसिकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लोकशाही दिनात प्राप्त तक्रार प्रलंबित राहिल्यास कार्यालय प्रमुख जबाबदार -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

Next Post
अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d