Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
हतनूर धरणातून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी

जळगाव(जिमाका)- भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील विविध विभागांनी जिल्हाभरात नाविण्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्या. अमृत महोत्सवी भारत उपक्रमाचे आयोजनाबाबत आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ फुलपाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल कुटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, तहसीलदार सुरेश थोरात आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगसट, 2022 पर्यंत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहेत. यात 75 आठवड्यात 75 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी याबाबत आवश्यक ते नियोजन आतापासूनच करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यावेळी दिल्यात. यात सायकल रॅली, हेरिटेज वॉक, धावण्याच्या स्पर्धा, लोककलेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती, बालनाट्य महोतसव,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला आयोजित करणे, आकाशवाणीवरुन जिल्ह्यातील स्वातंत्र चळवळीशी संबंधित स्वातंत्र्य सैनिक, घटना, स्थळे यांची माहिती देणे, वृक्ष लागवड करणे, जिल्ह्यातील 75 गावांमध्ये अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, श्रमदान शिबिर, रक्तदान शिबिर, स्वातंत्र्य सेनानी यांचा सत्कार करणे, ऐतिहासिक स्थळांच्या नामफलकाचे अनावरण करणे, बचतगटांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, मान्यवरांकडून स्वातंत्र चळवळीवर लेख लिहून त्यांची विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्दी करणे, मान्यवरांच्या आकाशवाणीवर मुलाखती घेणे आदि उपक्रम राबविण्याचे नियोजन असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच त्याचे नियोजन करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या असून संबंधित विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीनुसार कार्यक्रम घेण्याच्या सुचनाही श्री. राऊत यांनी या बैठकीत दिल्यात.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोविडमुळे अनाथ झालेल्यांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे निर्देश

Next Post

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d