Sunday, July 20, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्पर्धा परीक्षा आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर यश मिळवणं कठीण नाही -अमित माळी; राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीत समुपदेशन कार्यशाळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
स्पर्धा परीक्षा आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर यश मिळवणं कठीण नाही -अमित माळी; राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीत समुपदेशन कार्यशाळा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वावडदा येथील राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पत्रकार चेतन निंबोळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.

सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे स्वागत करुन कार्यशाळेस सुरवात करण्यात आली. भारतामध्ये एक फार मोठी तफावत म्हणजे श्रीमंती आणि गरिबी! याचाच परिणाम म्हणजे पैसे अभावी शिक्षण न घेणे. परंतु, श्रीमंत मुलं उच्च शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी मोठ्या मोठ्या शहरात जातात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एक मोठा गट या महागड्या शिक्षणापासून वंचित राहतो. याच गोष्टीचा विचार करुन गांधीजींनी सांगितल्या प्रमाणे खेड्याकडे चला या वाक्याला हृदयात ठेऊन मोठ मोठ्या संधी सोडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पुणेरी शिक्षण कसे देता येईल या संकल्पनेतून राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीचा जन्म झाला. ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नातीत वाढलो ती नाती कधीही विसरायची नसते याप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमी पुणेरी पॅटर्न उपलब्ध देत आहे. असे अकॅडमीचे संचालक राजेश जाधव हे समुपदेशन कार्यशाळेची प्रस्तावना मांडताना म्हणाले.

स्पर्धेच्या युगात पाय रोवून टिकायचं असेल व एवढ्या स्पर्धेच्या गर्दीत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर आत्मविश्वास व स्मार्टपणा असणं गरजेचं असतं. गुणपत्रिकेत ‘अ’ श्रेणी मिळालेले विद्यार्थीही आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मागे पडलेले दिसतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. त्याशिवाय तुमचे कष्ट, बुद्धिमत्ता काही उपयोगाची नाही. कामाच्या ठिकाणी तर हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये आपली ड्रेसिंग, स्वतः ची उपेक्षा नं करणं, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणं, नजरेला नजर देऊन बोलणं, चुका करण्यास घाबरू नका, मनातील भीती दुर करणं तसेच आपल्या प्रशासकीय व सामाजिक जीवनातील देखील यश अपयशाच्या बाजू अमित माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलून दाखविल्या.

तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. याही परिस्थितीला तोंड देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडील कल हा वाढलेला दिसून येत आहे. बिकट परिस्थितीला तोंड देत मुले ‘अधिकारी व्हायचं’ हे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करताना दिसतात.

परंतु स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पेलवत नाही. ही बाब लक्षात येताच अमित माळी यांनी कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके, पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी लागणारे सर्व साहित्य देण्याचे आवाहन केले.स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला घडवायचं असेल आणि समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेशिवाय दुसरा कोणाताही पर्याय नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन या क्षेत्रात यश मिळवता येतंच. असे यावेळी चेतन निंबोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खेळाडूंनी क्रीडा संकुलातून मार्गदर्शन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावे -मंत्री एकनाथ शिंदे

Next Post

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा; मिशन कवच कुंडल मोहिमेत ३ लाख ११ हजार लसीची मात्रा नव्याने प्राप्त

Next Post
रावण दहन कार्यक्रमास अटींवर परवानगी; नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया ऐवजी आरोग्य विषयक राबवावे -जिल्हाधिकारी

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा; मिशन कवच कुंडल मोहिमेत ३ लाख ११ हजार लसीची मात्रा नव्याने प्राप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications