Sunday, July 20, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटीबद्ध रहावे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटीबद्ध रहावे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

गडचिरोली(जिमाका)- देशाबाहेरील तसेच देशातील विविध समाजविघातक प्रवृत्तींचा बिमोड करण्यात आपल्या सुरक्षा दलांनी मोठे योगदान दिले असले तरी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. यामुळे सर्वसामान्यांनी त्यासाठी निर्धाराने कटीबद्ध राहण्याची गरज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

त्यांच्या हस्ते आज येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गडचिरोली-केवडीया सायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गडचिरोली बटालियनकडून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, सीआरपीएफच्या अतिरिक्त महानिर्देशक (दक्षिण विभाग) रश्मी शुक्ला, पश्चिम विभागाचे महानिर्देशक रणदीप दत्ता आदी उपस्थित होते.

देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान प्रयत्नांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले, वल्लभभाई हे अत्यंत दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या नियोजनामुळे आज देशाला मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सीआरपीएफने आयोजित केलेली ही रॅली देशातील विविध भागातील नागरिकांना एकतेचा संदेश देणारी ठरेल.

समाजविघातक प्रवृत्तींमुळे आज समाजाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. आपली सुरक्षा दल त्यांचा मुकाबला करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी त्यांना यथाशक्ती पाठबळ द्यावे, असे आवाहन करुन राज्यपालांनी आपल्या भाषणात सीआरपीएफच्या योगदानाचा विशेष गौरव केला.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत -राज्यपाल

Next Post

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 20 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications