Saturday, July 12, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांचा विकास साधणार -कृषी मंत्री दादाजी भुसे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांचा विकास साधणार -कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव(उमाका वृत्त सेवा)- असंख्य चिमुकल्यांच्या डोळ्यात असलेल्या भविष्याचा दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सामाजिक दायित्व निधीतून विकास साधतांना विलक्षण आनंद होत असून तालुक्यातील सर्व शाळांचा या माध्यमातून विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले.

सिंजेंटा इंडीया लि. या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेल्या तीन जिल्हा परिषद शाळांचे लोकार्पण कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी सिजेंटा कंपनीचे पी.एस.जगदिशा, संजय पवार, भगवानराव कापसे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नायब तहसिलदार विकास पवार यांच्यासह निळगव्हाण, हाताणे व जळकू या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्यांबरोबर सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, गोरगरिबांची मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यांची दयनिय अवस्था पाहून त्यांना उभारी देण्याच्या उद्देशाने, सामाजिक दायित्व निधीतून त्यांचा विकास साधण्याचे ध्येय ठरविले होते. गतवर्षी निळगव्हाण, हाताणे व जळकू येथील नुतन इमारतींचे भुमीपूजन करण्यात आले होते, आणि आज त्याच शाळांच्या भव्य इमारतींचे लोकार्पण करतांना आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या शाळांच्या नवीन इमारतींची देखभाल राखण्याची जबाबदारी शिक्षकांसोबतच सर्व ग्रामस्थांनी पार पाडावी असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ईद- ए-मिलाद घरी राहूनच साजरी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार -मुख्यमंत्री

Next Post
कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार -मुख्यमंत्री

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications