Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करतात’ अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत कवी नितीन देशमुख यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/12/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
‘कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करतात’ अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत कवी नितीन देशमुख यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी – (भुसावळ) – कवितेने समाजाचे हजारो वर्षांपासून प्रबोधन केले आहे.कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम करतात.’’अश्रुना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृद्याला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवरती सहजच नेता आले असते’’.एकेमकांचे दुःख जर का समजून घेता आले असते तर जगणे किती सुंदर अझाले असते, आणि त्यातून जगण्याच्या जाणिवा समृद्ध झाल्या असत्या असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी नितीन देशमुख यांनी केले. मंगळवार रोजी अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ऑनलाईन प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प गुंफण्यात आले यावेळी ‘प्रश्न टांगले आभाळाला’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे आणि देशदूतचे संपादक हेमंत अलोने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प समन्वयक संजय भटकर यांनी उपक्रमाची रूपरेषा मांडली. तर रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी आई-वडिलांची सेवा हीच आपली संपत्ती असल्याचे मनोगत व्यक्त केले.शहराची श्रीमंती ही सांस्कृतिक जडण घडण, सांस्कृतिक वारसा आणि सांस्कृतिक उपलब्धी यावर ठरत असते.उपक्रम अनेक सुरु होतात पण त्यात सातत्य ठेवणे महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे अश्या भावना देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी व्यक्त केल्या.समारोपीय मनोगतात तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी कवी हे जगण्याच्या जाणिवा समृद्ध करून समाजाला दिशा देण्याचे काम करतात अश्या सवेंदनशील भावना व्यक्त केल्या.

गझलेतून जीवन जगण्याची जाणीव

‘’जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणार्‍याला नाही,जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही’’
‘प्रश्न टांगले आभाळाला’ या गझलेतून कवी नितीन देशमुख यांनी जीवन जगण्याची जाणीव करून दिली.जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर माती वरती यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आशा मांडल्या.कवितेतून फक्त प्रश्न मांडू नयेत तर उत्तर देखील शोधता आली पाहिजे.’’हल्ली स्वप्ने मातीवरती रांगत नाही, म्हणून आता घरात गरपं नाही, उजेड देणारी ती झाडे विझुन गेली, घरात आता आजी गोष्टी सांगत नाही’’.डिजिटल युगात गती आली आहे.पण आपण स्थिरता, गावखेड्यातील पार, फुरसत,सामंजस्य आणि आपले पानांची जाणीव गमावून बसलो आहे अश्या भावना नितीन देशमुख याने व्यक्त केल्या

उपक्रमासाठी जळगावचे कलारसिक विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे अजय बढे यांचे सहकार्य लाभले तर दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरिभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प सहसमन्वयक देव सरकटे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील,राजू वारके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. आभार प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात निवड

Next Post
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात निवड

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications