जळगांव – (प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा शाखेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळाव्याचे उदघाटन विधान परिषद सदस्या श्रीमती.स्मिताताई वाघ, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.रमेशजी मकासरे, होते . प्रमुख उपस्थिती मध्ये जळगांव शहराचे लाडके आमदार मा.राजुमामा भोळे,भुसावळ नगर परिषदच्या उप नगराध्यक्षा श्रीमती.लक्ष्मीताई मकासरे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी मा.विद्यासागर राव,सह सहाय्यक प्रकल्प अधिकारी खड़गे साहेब, जिल्हा प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर, शहर जिल्हा अध्यक्ष तथा नगर सेवक रविंद्रभाऊ खरात,जिल्हासरचिटणीस मिलींद तायडे,रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, युवा जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे,जळगांव विभागीय अध्यक्ष दिपक सपकाळे,यावल तालुकाध्यक्ष अरुण गजरे,चोपड़ा तालुकाध्यक्ष भिवराज रायसिंगे,जळगांव महानगर अध्यक्ष अनिल अड़कमोल,युवा महानगर अध्यक्ष मिलींद सोनवणे,चंदन अढायक़े,विष्णु पारधे,भिमराव गजरे,लखन लोहार,विलास भास्कर,राजु लोहार होते.कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना राजू मामा भोळे म्हणाले मुद्रा योजनेचा फायदा करून घ्या सक्षम व्हा कोणत्याही बॅंकेने कर्ज देतांना टाडा टॉड केली तर माझ्याशी संपर्क साधा कर्ज घ्या सक्षम व्हा बॅंकेचे हप्ते वेळवर भरा भविष्यात सर्व ऑनलाईन होत असल्याने तुम्हाला अडचण येता कमानये ,स्वछता गृह ,घरकुल विषयी बोलतांना मामा म्हणाले भारत देशाचे पंतप्रधान मा.मोदी साहेबांची घोषणा आहे २०२२ पर्यंत प्रत्येकाला स्वतःचे राहील अशा पद्धतीने आम्ही काम करत आहोत शासनाच्या सर्वच योजना अभ्यासात घेऊन त्यांचा फायदा शेवटच्या घटका पर्यंत पोहचवण्यास आम्ही तत्पर आहोत कोणालाही अडचण येत असेल तर मला संपर्क करा इतकं बोलून थांबले तदनंतर स्मिता वाघ यांनी महिला सबलीकरणा साठी राज्य सरकार केंद्रीय सरकार भर भक्क्म निधी उपलब्ध असून आपण सर्वांनी लाभ घ्यावा, सत्ता आपली आहे कुठंच अडचण येणार नसल्याचे स्पस्ट करून थांबले. आनंद बाविस्कर यांनी बोलतांना जळगांव महानगरात भूतों ना भविष्य कधीही न झालेला कार्यक्रम जळगांव जिल्हा महिला कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमा मुळे रिपब्लिकन पक्षाला नवीन दिशा मिळाल्याची चर्चा संपूर्ण महानगरात होत आहे.जळगाव जिल्ह्यात महिला आघाडी सक्रीय झाल्या मुळे काही लोक धस्तावल्याची चर्चा या वेळी सुरु होती असा चिमटा विरोधकांना घेतला .
या कार्यक्रमच्या यश्वीते साठी रिपाइंच्या रण रागिनींनी अथाक परिश्रम घेऊन जळगाव महानगरात रिपब्लिकन पक्षाला संजीवनी दिली.त्या रण रागिणीच्या वतीने अनेक महत्व पूर्ण निर्णय या कार्यक्रमात घेण्यात आले. या कार्यक्रमाला महिला जिल्हा प्रमुख श्रीमती.नंदाताई बाविस्कर,महिला जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती.चारुलता सोनवणे,जिल्हा सरचिटणीस श्रीमती.मिनाक्षीताई पाटिल, महिला महानगर श्रीमती.प्रतिभाताई भालेराव,पुनम नाथ,गीता वाघ,मंगला सावळे,निर्मला लोहार,मनीषा अग्रवाल,पुष्प लता कुलकर्णी,रुबीना बी शेख,गायत्री सोनार,पूजा भावसार,आदींनी परिश्रम घेतलेकार्यक्रमाचे सूत्र संचालन युवराज सोनवणे,यांनी केले तर आभार जिल्हा प्रमुख नंदा बाविस्कर यांनी मानले.