Thursday, July 24, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जन्मदात्यांची संपत्ती बळकावून आईला सोडले वाऱ्यावर

user by user
31/07/2022
in क्राईम, जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
जन्मदात्यांची संपत्ती बळकावून आईला सोडले वाऱ्यावर

पाचोरा – (प्रतिनिधी)

आईवडील त्यांच्या अपत्यांना लाडाने, प्रेमाने वाढवितात. त्यांचे पालनपोषण करतात. कारण त्यांना ही अपेक्षा असते की त्यांच्या उतार वयात, शेवटच्या काळात याच मुलांनी त्यांचा आधार व्हावा. परंतु पुढे हीच मुले आईवडिलांची अवहेलना करत त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. अशीच एक घटना पाचोरा येथे घडली असून, या घटनेत मुलांनी त्यांच्या आईवडिलांची संपत्ती बळकावत जन्मदात्या आईला वाऱ्यावर सोडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भीमाबाई पुंडलिक सावळे (वय ७०, रा. डोंगरगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव)
यांना दोन मुले व तीन मुली अशी अपत्ये असून त्यांच्या तिन्ही मुली विवाहित आहेत. या विवाहित मुलींपैकी द्वितीय कन्या गतवर्षी कोरोनामुळे मरण पावली. व्यवसायाने शेतीकाम करणारा मुलगा धनराज व पाचोरा एसटी डेपोत नोकरीला असलेला मुलगा आत्माराम या दोघांनी भीमाबाई यांना “आता तुम्ही म्हातारे झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला सोसायटी किंवा बँक कर्ज काढणे करिता पाचोरा येथे जाणे अवघड होईल म्हणून तुमच्या नावावरील जमीन आमच्या दोघा भावांच्या नावावर करून द्या” असे म्हणत आईवडिलांकडून जमीन नावावर करून घेतली. सावळे दाम्पत्यानेही मुलांवर विश्वास ठेवून जमीन त्यांच्या नावावर करून दिली पण काही दिवसातच दोघा भावांनी त्यातील दीड एकर जमीन १३ लाख रुपयात व पाचोरा येथील राहते घर १८ लाख रुपयात विकून त्यांच्यावर झालेले कर्ज काही प्रमाणात फेडून टाकले.

त्यानंतर दोघा भावांमध्ये आपसात भांडणे सुरू झाली. मागील दोन वर्षांपूर्वी दोन्ही भावांनी वेगळे निघून त्यांच्यावरील असलेले सरकारी व सावकारीचे ४५ लाख रुपये कर्ज अर्धे अर्धे वाटून घेतले. मोठा मुलगा धनराज याने आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी दीड एकर जमीन जास्त घेतली. परंतु काही दिवसानंतर त्याने लहान भाऊ आत्माराम यास “तू आईला सांभाळ, मी वडिलांना सांभाळतो” असे म्हणत भीमाबाईंना त्याचेकडे सोडून दिले.
त्या दिवसापासून आत्माराम भीमाबाईंचा अतोनात छळ करत आहे तसेच त्यांना जेवणही देत नाही आहे, त्यामुळे भीमाबाई चार-पाच महिने त्यांच्या मोठ्या मुलीच्या मुलाकडे राहिल्या. परंतु स्वाभिमानी असलेल्या भीमाबाई यांना दुसऱ्यांकडे इतके दिवस राहणे पटत नसल्याने त्या परत आत्मारामकडे गेल्या असता, त्याने त्यांना घरात घेतले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या नातवाला मूळगावी सोडण्यास सांगितले असता, मोठ्या मुलानेही आईला घरी घेण्यास टाळाटाळ केली. हे पाहून भीमाबाई ह्या “मी भीक मागून खाईल” म्हणत स्वतःच्या मूळगावी गेल्यावर तेथे मोठा मुलगा, सून, नातू यांनी त्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर शेजारच्यांनीही भीमाबाईंना काही खाण्यापिण्यास दिल्यास त्यांनाही शिवीगाळ करत असे.

यामुळे भीमाबाई यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून, त्यांना दोन वेळेचे जेवणही मिळणे कठीण झाले आहे. जर कधी भीक मिळाली नाही, तर शेजारचे लोक त्यांना खायला-प्यायला देतात. कोटी रुपयांची संपत्ती असूनही सावळे दाम्पत्य जेवणाला पारखे झालेले आहे.

याची दखल घेत पाचोरा तालुक्यातील काही स्वयंसेवी संस्था उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांना निवेदन करून भीमाबाई व त्यांच्या पतीने मुलांच्या नावे केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अगोदरही अमळनेर येथील अशाच मुलांनी आपल्या आईवडिलांचा छळ केल्यामुळे उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांनी मुलांच्या नावावर केलेले संपत्तीचे खरेदीखत रद्द केलेले आहे.

त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे खरेदीखत रद्द करून सदर संपत्ती पुन्हा भीमाबाई व त्यांच्या पतीच्या नावे करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन कडक कारवाई करण्यासाठी सत्यमेव जयते न्यूज चॅनेलच्या टीमकडुन पाठपुरावा केला जाणार आहे.

user

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मासु कडुन न्यू हायस्कूल महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी (GS) पदावर कु.तुषार शिंदे ह्यांची नियुक्ती

Next Post

घरबसल्या करता येणारी “ही” ऑनलाइन कामे करा व पैसे कमवा

Next Post
घरबसल्या करता येणारी “ही” ऑनलाइन कामे करा व पैसे कमवा

घरबसल्या करता येणारी "ही" ऑनलाइन कामे करा व पैसे कमवा

Comments 1

  1. Gourav says:
    3 years ago

    कठोर शिक्षा झाली पाहिजे. यांच्या वर

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications