Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाळेच्या विकासात लोकसहभागाचे महत्व!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2019
in लेख, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थांना शिकवता शिकवता मनात सहज विचार येवून गेला किती बदलली ना आजची पिढी, शिक्षण, सर्व काही.. आणि आधीचा शिक्षणाचा काळ समोर येत गेला आधीच्या शिक्षणात पालकाचा सहभाग कमी होताआता शिक्षण पद्धती मधे लोकसहभाग वाढू लागला . आधीच्या काळात लोकसंख्येच्या मानाने शाळा कमी असायच्या विद्यार्थि संख्या चांगली होती शाळेची पटसंख्या देखील चांगली असायची.पण २१व्यां शतकाकडे वाटचाल सुरू झाली तसतसे चित्र पालटू लागले पारंपारिक शिक्षणाची जागा डिजिटल शिक्षण घेवू लागले. पालकांचं कल मराठी शाळे ऐवजी सेमी इंग्रजी, इंग्लिश मिडीयम शाळेकडे झुकायला लागला. मोठमोठ्या इमारती,भौतिक सुविधा, फाडफाड इंग्रजी बोलणारे शिक्षक तज्ञ पालकांना भुरळ घाल याला लागले.आपले मूल आजच्या स्पर्धांच्या काळात टिकले पाहिजे म्हणून मग पालक देखील मुलांना मोठ्या शाळेत टाकायला लागले. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला मराठी शाळा ओस पडू लागल्या विद्यार्थि संख्या कमी झाली,आज काही मराठी शाळांचा शोकांतिका तर ही आहे की त्या बंदच झाल्या.मग आता जर आपली शाळा टिकवून ठेवायची असेल,प्रभाव दाखवायचं असेल तर काय करावं ? हा प्रश्न उभा राहिला. शाळेची फक्कत गुणवत्ता च नव्हे तर भौतिक विकास सुद्धा लोकांना दिसायला हवा हे शिक्षकांना मनोमन पटायला लागले. पण ? सरकार मोफत गणवेश,तांदूळ,पाठ्यपुस्तक याशिवाय काहीही मोफत देत नाही.आणि मग शाळेचा भौतिक विकास करण्यासाठी शाळेच्या विकासात लोकसहभाग ही संकल्पना पुढे आली.शाळेचा विकास करायचा असेल तर लोकांना आपल्या शाळेतील उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या वे लागेल.आम्ही देखील शाळेतील विविध उपक्रमांमध्ये पालकांना सहभागी करून घेत असतो.त्यामुळे शाळेतील सर्व घडामोडी पालक जवळून बघत असतात ,शिक्षक पालक संवाद निर्माण होतो लोकसहभाग वाढत जातो मग पालकांना ही वाटतं फूल नाही फुलाची पाकळी तरी या उद्देशाने शाळेला मदत करतात.हा माझा शाळेतील लोकसहभागातून मला आलेला अनुभव आहे.याच लोकसहभागातून किती तरी शाळांनी आपल्या शाळेचे रूप बदलले आहे .मराठवाड्यात लोकसहभागातून तब्बल ६६ कोटी ४३ लाख रुपये उभारले .अलिकडचे च उदाहरण द्यायचं झालं तर वाबेलवडी शिरपूर पुणे येथील जिल्हा परिषद ची शाळा ही झीरो एनर्जी इंटरनॅशनल स्कूल म्हणून जगात ३ रा नं वर आहे भारतात १ न आहे. या शाळेतील वारके सर यांनी लोकसहभागातून संरक्षण भिंत, रंग, संगणक, t.v, tablet, e लर्निग, डिजिटल शाळा, फरशी,वर्गखोल्या गावकऱ्यांनी स्वतःहून बांधून दिल्या. यासर्व गोष्टीमुळे शाळेचे रूपडे पालटले आहे. आज तेथे ४०० विद्यार्थि शिकत आहे तर ४००० विद्यार्थि वेटींग लिस्ट वर आहे.ही शाळा जि. प. ची असली तरी या शाळेला भेट देण्यासाठी देश_ विदेशातील लोक येत असतात. हे सर्व लोकसहभागातून शक्य झाले. शाळेच्या विकासात लोकसहभाग चे महत्व यापेक्षा सुंदर उदाहरण अजून काय असू शकते!


सुवर्णा अडकमोल – (शिक्षिका -सरस्वती विद्या मंदिर)

मो.नं- 7350097131

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अन् इथे माणुसकीला पाझर फुटला..!

Next Post

धरणगांव येथे तंबाखू मुक्त कार्यशाळा उत्साहात संपन्न;४ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

Next Post
धरणगांव येथे तंबाखू मुक्त कार्यशाळा उत्साहात संपन्न;४ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

धरणगांव येथे तंबाखू मुक्त कार्यशाळा उत्साहात संपन्न;४ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications