Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ACC and Ambuja: अदानी समूहातील बड्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईतून गुजरातमध्ये हलवली, कर्मचारी टेन्शनमध्ये

Desk Team by Desk Team
01/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

adnai group comapnes headquarters in Mumbai moved to Ahembad | हिंडेनबर्ग रिपोर्टच्या दणक्यानंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यानंतर सातत्याने अदानी समूहाच्या चौकशीची मागणी होत आहे.
मुंबई: हिंडेनबर्ग अहवालानंतर प्रचंड मोठा आर्थिक फटका बसलेल्या अदानी समुहाकडून गेल्या काही दिवसांमध्ये महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अदानी समूहातील काही कंपन्यांची मुंबईत असलेली मुख्यालये ही गुजरातच्या अहमदाबाद येथे हलवण्यात आली आहेत. यामध्ये एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची मुख्यालये गुजरातला गेल्याने आता अनेक महत्त्वाचे प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय तिथूनच घ्यायला सुरुवात झाली आहे. परंतु, कंपनीचे सीईओ अजय कपूर हे अद्याप मुंबईतच आहेत. यामुळे अंबुजा आणि ACC या कंपन्यांमध्ये दोन प्रशासकीय केंद्रे तयार झाली आहेत. परिणामी कंपन्यांचा कारभार सांभाळताना आणि निर्णय घेताना बराच गोंधळ उडताना दिसत आहे.
अदानी समूहाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली होती. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. मात्र, हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर शेअर बाजारात झालेली पडझड आणि चौकशीच्या संभाव्य ससेमिऱ्यामुळे अदानी समूहान काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये नेली आहेत. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. कामकाजासाठी त्यांना वारंवार मुंबई आणि अहमदाबाद अशा चकरा माराव्या लागत आहेत. या त्रासाला अनेक कर्मचारी कंटाळले आहेत. गुजरातमध्ये जाण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कर्मचाऱ्यांनी दुसरीकडे नोकऱ्या शोधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. यामध्ये मुख्यत्वेकरुन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सतत मुंबई-अहमदाबाद अशा येराझारा मारणे या महिला कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्याऐवजी अहमदाबाद येथेच कायमस्वरुपी वास्तव्य करणे हा एक पर्याय आहे. मात्र, त्यापूर्वी हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळेल का, याची चाचपणी करत आहेत.
अंबुजा आणि एसीसी या दोन्ही कंपन्यांचे मिळून १० हजार कर्मचारी मुंबईत कार्यरत आहेत. यामध्ये एसीसी कंपनातील ६ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ६० टक्के कर्मचारी हे व्यवस्थापन मनुष्यबळ आहे. तर उर्वरित ४० टक्के कर्मचारी हे फ्लोअर वर्कर्स आहेत. तर अंबुजा कंपनीतील ४७०० जण मुंबईत कार्यरत आहेत. यापैकी ७० टक्के कर्मचारी हे व्यवस्थापन वर्गवारीतील आहेत. मात्र, दोन्ही कंपन्यांची मुख्यालये गुजरातला हलवल्याने त्यांचे वरिष्ठ हे अहमदाबादच्या कार्यालयातून काम करत आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये स्थायिक होण्याचा पर्याय मान्य नसलेल्या मुंबईतील कर्मचाऱ्यांना गुजरातला खेटे मारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
संसदेत अदानी प्रकरण गाजलं; विरोधी खासदारांचं संसदेच्या व्हरांड्यात बॅनर झळकवत आंदोलन
Desk Team

Previous Post

बापटांच्या निधनानंतर चार दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ पोस्टर, जितेंद्र आव्हाड म्हणतात सूतक तरी संपू द्या

Next Post

जळगाव-धुळे highway वर भीषण अपघातात युवक जागीच ठार.

Next Post

जळगाव-धुळे highway वर भीषण अपघातात युवक जागीच ठार.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo