Saturday, August 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read


जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : – राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग/व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व स्वंयरोजगार नवीन संधी विचारात घेवून उद्योजकांना चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्वकांक्षी योजना सन 2019-20 पासून राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयांमार्फत राबविण्यात येत आहे.
ही योजना मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र उत्पादन व सेवेच्या उद्योग व्यवसायासाठी आहे. या योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण व 45 वर्षापर्यंतचे (अनुसूचित जाती/जमाती/महिला/इतर मागासवर्ग/अपंग/माजी सैनिक/ विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांच्यासाठी 5 वर्ष शिथिल) पात्र राहतील. या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण व 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे)


या योजनेत उत्पादन व्यवसायासाठी (उदा. बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन) 50 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. व सेवा उद्योग व्यवसायासाठी (उदा. सलुन/रिपेअरींग व्यवसाय, ब्यूटी पार्लर इ.) 20 लाख रुपयांपर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती/जमाती/महिला/ इतर मागासवर्ग/अपंग/माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किमतीच्या 25 टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक 5 टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी 15 टक्के व ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने http://maha-cmegp.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करतांना अर्जदारास स्वतःचा फोटो, आधार कार्ड, (रहिवास दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/जन्मदाखला), मार्कशीट, पॅनकार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला वेबसाईटवरुन वरुन डाउनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपात्र (Undertaking form) ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
जिल्ह्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना नविन उद्योग/व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज करावा. किंवा योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र/खादी ग्रामोद्योग मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजसमोर, जळगाव येथे कार्यालयीन कामाचे दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच ही योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही. या योजनेचा लाभ घेतांना लाभार्थ्याची खाजगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अर्जदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर परिपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव दुरध्वनी क्र. 0257/2252832 वर अथवा didicjalgaon@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

धनाजी नाना महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

Next Post

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 20 व 21 एप्रिल रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी 20 व 21 एप्रिल रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications