Friday, June 9, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

…’हे’ वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/05/2023
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
…’हे’ वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती

राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. तर जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत शिक्षकांच्या नेमक्या जागा समजणार नाहीत आणि भरती करता येणार नाही, अशी माहिती राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत ही भरती होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

राज्यातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये राज्य सरकारने नुकतीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढ केली आहे. त्यानंतर राज्यातील हजारो शिक्षकांची पदे रिक्त असल्याबाबत ही पदे भरावी यासाठी सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकारने सुमारे 30 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत उमेदवार:– राज्यातील डीएड झालेले अनेक विद्यार्थी हे टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा न झाल्यामुळे हे विद्यार्थी शिक्षक म्हणून होणाऱ्या भरतीसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे सरकारने त्वरित शिक्षक पात्र परीक्षा घ्यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देवल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही टेट ही परीक्षा घेतली आहे. टेट परीक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत असून गरजेप्रमाणे या विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल. तसेच टीईटी परीक्षेच्या संदर्भातही आम्ही सकारात्मक असून लवकरच ती परीक्षा सुद्धा घेतली जाईल असे देवल यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन:– दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या यावर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या प्रमाणात शिक्षक भरती केली जाते किंवा एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्या शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये वर्ग केले जातात. यासाठी राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करून नेमकी विद्यार्थी संख्या किती आहे, याचा आढावा घेतला जात आहे. राज्यात एकूण दोन कोटी तेरा लाख विद्यार्थी आहेत. यापैकी दीड कोटी विद्यार्थ्यांची आधार तपासणी झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची आधार तपासणी लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

संच मान्यतेच्या प्रतीक्षेत:– एकदा ही सर्व संख्या हाती आल्यानंतर त्यानुसार शिक्षक भरती लगेच करण्यात येईल, त्यासाठी संच मान्यता घेण्यात येईल. एक सप्टेंबरला या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार संच मान्यता घेऊन पुढील कार्यवाही केली जाते. त्याचप्रमाणे आताही संच मान्यता मिळाल्यानंतर शिक्षक भरती केली जाईल असेही देवल यांनी सांगितले

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यातील ‘इतक्या’ लाभार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ…

Next Post

महिलांना आर्थिक बळ मिळण्यासाठी सरकार करतंय ‘ही’ मदत

Next Post
महिलांना आर्थिक बळ मिळण्यासाठी सरकार करतंय ‘ही’ मदत

महिलांना आर्थिक बळ मिळण्यासाठी सरकार करतंय 'ही' मदत

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन;फालीच्या नवव्या संमेलनाचा समारोप

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!  शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!  शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

‘या’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना मिळणार प्रसूती रजा….

दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

काव्यरत्नावली चौक उजळला…

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2022/10/VID-20221026-WA0000.mp4

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
%d bloggers like this: